Festival Posters

खड्डेच बघण्यासाठी चांद्रयान 3 चंद्रावर पाठवण्यापेक्षा महाराष्ट्रात सोडलं असतं

Webdunia
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका करत पनवेलमधील भाषणाला सुरूवात केली. भाषणात त्यांनी राज्यातील रस्त्यांच्या खड्ड्यांवर लक्ष वेधत म्हटले की चांद्रयान 3 हे चंद्रावर पाठवल्याने त्याचा आपल्याला काय उपयोग? चंद्रावर जाऊन ते यान खड्डेच बघणार त्यापेक्षा ते महाराष्ट्रात पाठवलं असतं तर खर्च वाचला असता. असं म्हणत राज ठाकरे यांनी रस्त्यातील खड्ड्यांवर टीका केली.
 
पनवेल शहरात निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं जेथे बोलत असताना राज ठाकरे यांनी गेले 17 वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग आणि राज्यातील रस्त्यांची अवस्था यावर जोरदार टीका केली.
 
राज ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी जनतेला प्रश्न विचारला की राज्यातील सर्वच पक्षांनी तुमचा भ्रमनिरास केला तरी तुम्ही त्यांना परत कशाला मतदान करता?
 
त्यांनी म्हटले की अनेक लोक राज्याचा विकास करण्यासाठी पक्ष बदलत असल्याचं सांगतात अरे पण कशाला खोटं बोलताय?, असा म्हणत राज ठाकरेंनी दलबदलूंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की सत्ताधारी पक्षाने दुसऱ्या पक्षांचे आमदार न फोडता स्वत:चा पक्ष वाढवून दाखवावा. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

20 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस 26 जानेवारीपासून या मार्गावर धावणार

Republic Day 2026 Wishes in Marathi प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Republic Day 2026 Essay in Marathi प्रजासत्ताक दिनावर मराठी निबंध

ज्येष्ठ पत्रकार मार्क टली यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन

LIVE: भाजपला रोखण्यासाठी सोलापुरात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले

पुढील लेख
Show comments