Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खड्डेच बघण्यासाठी चांद्रयान 3 चंद्रावर पाठवण्यापेक्षा महाराष्ट्रात सोडलं असतं

Webdunia
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका करत पनवेलमधील भाषणाला सुरूवात केली. भाषणात त्यांनी राज्यातील रस्त्यांच्या खड्ड्यांवर लक्ष वेधत म्हटले की चांद्रयान 3 हे चंद्रावर पाठवल्याने त्याचा आपल्याला काय उपयोग? चंद्रावर जाऊन ते यान खड्डेच बघणार त्यापेक्षा ते महाराष्ट्रात पाठवलं असतं तर खर्च वाचला असता. असं म्हणत राज ठाकरे यांनी रस्त्यातील खड्ड्यांवर टीका केली.
 
पनवेल शहरात निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं जेथे बोलत असताना राज ठाकरे यांनी गेले 17 वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग आणि राज्यातील रस्त्यांची अवस्था यावर जोरदार टीका केली.
 
राज ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी जनतेला प्रश्न विचारला की राज्यातील सर्वच पक्षांनी तुमचा भ्रमनिरास केला तरी तुम्ही त्यांना परत कशाला मतदान करता?
 
त्यांनी म्हटले की अनेक लोक राज्याचा विकास करण्यासाठी पक्ष बदलत असल्याचं सांगतात अरे पण कशाला खोटं बोलताय?, असा म्हणत राज ठाकरेंनी दलबदलूंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की सत्ताधारी पक्षाने दुसऱ्या पक्षांचे आमदार न फोडता स्वत:चा पक्ष वाढवून दाखवावा. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

बेल्ट आणि काठ्यांनी मारहाण केली, पाणी मागितले तर तो ग्लासमध्ये थुंकला; विद्यार्थ्याचे भयानक क्रूर रॅगिंग

हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले, विजय वडेट्टीवार म्हणाले आम्हाला आनंद....प्रतिक्रिया आली समोर

LIVE: राष्ट्रवादी काँग्रेस १९ ते २७ फेब्रुवारी दरम्यान 'स्वराज्य सप्ताह' साजरा करणार

डोके प्लास्टिकच्या कव्हरने झाकले आणि हात-पाय बांधले

उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का, साळवी यांच्यानंतर जितेंद्र जनावळेंचा राजीनामा

पुढील लेख
Show comments