Dharma Sangrah

राज ठाकरे यांनी मोदींना पाठींबा देण्याचे कारण सांगितले म्हणाले-

Webdunia
रविवार, 14 एप्रिल 2024 (17:19 IST)
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला त्यांच्या पक्षाच्या वार्षिक मेळाव्यात पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्राच्या महायुती आघाडीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. आता आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यामागचे कारण स्पष्ट केले आहे. राज ठाकरे म्हणाले, गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही नरेंद्र मोदींना पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली होती. माझ्या निर्णयावर अनेकांनी शंका घेतली. मी पहिल्या 5 वर्षात मोदी सरकारला विरोध केला होता कारण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती, पण मोदी सरकारने नव्या योजनांवर काम सुरू करताच माझे मत बदलले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढे म्हणाले, कलम 370 असो, राम मंदिर असो किंवा एनआरसी असो... राम मंदिराचे काम अनेक दशकांपासून रखडले होते. ते काम कोणीही पूर्ण करू शकले नाही पण मोदी सरकारने ते केले. पंतप्रधान मोदी नसते तर राम मंदिर बांधले नसते. नरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हावे.

भारताच्या प्रगतीसाठी मोदी सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत." राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रासाठी ज्या काही योजना महत्त्वाच्या आहेत, त्या आम्ही मोदी सरकारसमोर मांडू. पंतप्रधान मोदींनी कधीही कोणत्याही राज्याशी भेदभाव केला नाही.सर्व राज्यांसाठी योग्य तो निर्णय घेतात, असे ठाकरे म्हणाले,

Edited By- Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूरमधील स्फोटक कारखान्यात स्फोट

जमकरन मशिदीवर लाल झेंडा फडकवला, इराणने अमेरिका आणि इस्रायलला विनाशाचा इशारा दिला

इंडिगोची पुणे-बँकॉक विमानसेवा तात्पुरती स्थगित, प्रवाशांमध्ये संतापाची लाट

कमी दृश्यमानता आणि सुरक्षेतील त्रुटी ही अजित पवारांच्या विमान अपघाताची कारणे, AAIB चा तपास अहवाल प्रसिद्ध

अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण रोहित पवार करत आहेत', राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा गंभीर आरोप

पुढील लेख
Show comments