Dharma Sangrah

वाचा, राज्य मंत्रिमंडळात घेतलेले महत्त्वाचे ६ निर्णय

Webdunia
गुरूवार, 20 जानेवारी 2022 (20:53 IST)
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत १२ जलसंपदा प्रकल्पांना ११४ कोटी रुपयांऐवजी ६२४ कोटी रुपये किंमतीच्या मर्यादेत निविदा निश्चित करण्यास मान्यता दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच शाळा सुरु करण्याबाबत चर्चा झाली. अल्पसंख्यांक विभागात मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाचे ६ निर्णय घेण्यात आले आहेत.
राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आलेले ६ निर्णय असे 
अल्पसंख्यांक विकास
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलात वाढ
क्रीडा
विभागीय व जिल्हा स्तरावरील क्रीडा संकुल बांधकाम योजनेचे अनुदान वाढवले
विधि व न्याय
मंगरुळपीर, जिल्हा वाशिम येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) या जोडन्यायालयांऐवजी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर मंगरूळपीर ही दोन न्यायालये नियमित स्वरुपात कार्यरत करून पदनिर्मितीस मान्यता
 
विधि व न्याय
सावनेर, जिल्हा नागपूर येथे दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय स्थापन करून पद निर्मिती करण्यास मान्यता
महसूल
वाळू/रेती उत्खननाबाबत नवीन एकत्रितरित्या सर्वकष सुधारीत धोरण लागू
जलसंपदा
१२ जलसंपदा प्रकल्पांना ११४ कोटी रुपयांऐवजी ६२४ कोटी रुपये किंमतीच्या मर्यादेत निविदा निश्चितीस मान्यता

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments