rashifal-2026

मुंडेवरील बलात्काराचा आरोप रेणू शर्माने मागे घेतला, अजित पवारांनी मांडली अशी भूमिका

Webdunia
शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (16:28 IST)
गेल्या काही दिवसांआधी सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्माने बलात्काराचा आरोप केला होता. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा प्रदेश महिला मोर्चातर्फे सोमवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. मात्र आता बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे धनंयज मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली.  
 
धनंजयसंदर्भातील बातमी सकाळीच माझ्या कानावार आली, त्यावरुन नवीन येणाऱ्या 'शक्ती' कायद्याबाबात बारकाईने विचार करण्याची गरज वाटते, आता जॉईंट सिलेक्ट कमिटीकडं ते आम्ही दिलंय, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियाशी बोलताना म्हटले. जेव्हा धनंजय मुंडेंवर आरोप झाले, तेव्हा सगळीकडे ब्रेकिंग न्यूज सुरू होती. एखादा व्यक्ती राजकारणात काम करत असताना, त्याचं नाव चांगलं होण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. पण, एखाद्या गंभीर आरोपाने मोठी बदनामी होते, एका झटक्यात लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. विरोधकही आक्रमक होतात, महिला संघटना आंदोलन करतात. आता, ज्यांनी मागण्या केल्या, काही आक्रमक विधानं केली त्याला जबाबदार कोण?. महाराष्ट्रातील जनतेला माझी विनंती आहे, राजकारणात उंची प्राप्त करायला मोठा संघर्ष करावा लागतो. त्यामुळे, आरोप करणाऱ्यांनी आणि आरोपानंतर प्रतिक्रिया देणाऱ्यांनी विचार करायला हवा, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

एफआयआरमध्ये नाव नसणे म्हणजे क्लीन चिट नाही, पार्थ जमीन घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

शिवसेनेचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार!आदित्य ठाकरेंच्या दाव्याने गोंधळ

इंडिगो संकट जाणूनबुजून घडवले गेले होते का? सरकारने नोटीस बजावली, चौकशी सुरू

LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

वन्यजीवांसाठी अनंत अंबानी यांना जागतिक मानवतावादी पुरस्कार, वंताराला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली

पुढील लेख
Show comments