Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

त्र्यंबकेश्वरमध्ये पुरोहितांच्या घरी आयकर विभागाच्या धाडी

Webdunia
मंगळवार, 27 डिसेंबर 2016 (17:33 IST)
नोटबंदीनंतर आता काळा पैसा जमवण्याऱ्यावर आयकर विभागाने मोठी कारवाई करायला सुरुवात केली आहे. आधी बड्या व्यापाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील बड्या पुरोहितावर आयकर विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे.  यात त्र्यंबकेश्वरच्या दोन पुरोहितांच्या घरावर आयकर विभागानं धाडी टाकल्या आहेत.  या धाडीत कोट्यवधी  रुपयांचा काळा पैसा आणि काही किलो सोने जप्त करण्यात आल्याचे कळते.
 
त्र्यंबकेश्वरमध्ये पौरोहीत्य मोठ्याप्रमाणात केले जाते. गावातील बहुतांश लोक भिक्षुकीचा व्यवसाय करतात. सोबतच संपूर्ण देशात नारायण नागबली हा विधी फक्त त्र्यंबकेश्‍वर येथेच केला जातो. याशिवाय कालसर्प, त्रिपिंडी, प्रदोष, अभिषेक, मंत्रजागर आदी धार्मिक विधी वर्षभर सुरूच असतात. यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक देशविदेशातुन येत असतात. यातून याठिकाणी दररोज लाखो रुपयांची देवाण घेवाण होत असते. ह्या सर्व पैशांच्या व्यवहाराची कुठल्याच प्रकारची बिले, पावती असे काहीच दिले जात नाही. फक्त ‘दक्षिणा’ या नावाखाली लाखो रुपये जमवले जातात. त्यावर कुठल्याही प्रकारचा कर देखील आकारला जात नाही. त्यामुळे या पैशांचा कुठलाही हिशोब सुद्धा दिला जात नाही. नोटबंदीनंतर याच स्वरूपातला पैसा बँकेमध्ये मोठ्याप्रमाणात जमा करण्यात आला. यातून त्र्यंबकेश्वरमध्ये राहणाऱ्या दोन पुरोहितांकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली. हे दोन पुरोहित कोण आहेत व त्यांचे नाव अद्याप समजू शकले नाही. 
 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments