Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'गडकरी 2019 मध्ये त्रिशंकू लोकसभेची प्रतीक्षा करत आहे'

Webdunia
भाजपचा सहयोगी पक्ष शिवसेनेच्या खासदार संजय राउतने दावा केला आहे की देश "खंडित जनादेश" च्या दिशेने जात आहे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अशा परिस्थितीची "वाट पाहत आहे". 
 
शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' चे कार्यकारी संपादक राउतने वृत्तपत्राच्या लेखमध्ये लिहिले आहे की जेथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा क्रेझ कमी होत आहे तिथेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा मान वाढत आहे. राऊत म्हणाले, "देश एक खंडित जनादेशेच्या दिशेला जात आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यासाठी जबाबदार आहे." ते म्हणाले की 2014 मध्ये मोदीला मिळालेले पूर्ण बहुमत "वाया गेलेल्या वेळ" या सारखे होते. 
 
राऊत यांनी लिहिले की 2014 मध्ये मोदीं समर्थन लाट होती, कारण मतदारांनी काँग्रेसला पराभूत करण्याचा निर्णय घेतला होता, पण "आज चित्र बदलले आहे." शिवसेना खासदार म्हणाले, " मोदींची प्रतिमा आता बुडाली आहे. राहुल गांधी यांचे नेतृत्व मोदी जितके मोठे नाही, पण आता ती महत्त्वाची होत आहे कारण की जनतेला वर्तमान सरकाराकडून निराशा हाती लागली आहे." 
 
ते म्हणाले, "भाजपचे अनेक वरिष्ठ नेते आगामी निवडणुकीत पक्षाच्या वाईट कामगिरीबद्दल चिंतित आहे, पण नितीन गडकरी यांचे वक्तव्य हे एक संकेत आहे की आता वारं कोणत्या दिशेने वाहत आहे. गडकरी सारख्या नेत्यांना तर आरएसएस आणि भाजपचे नेते यांचा समानतेने पाठिंबा आणि मान आहे. 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments