Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिलिदिं एकबोटे यांना अटक का केली नाही?

Webdunia
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018 (11:14 IST)
कोरेगाव भीमा प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाचा सवाल
 
कोरेगाव भीमा प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारची कानउघाडणी केली. याप्रकरणी मिलिदिं एकबोटे यांना अटक का करण्यात आली नाही?, असा सवाल यावेळी कोर्टाने विचारला. एकबोटे यांच्या जामीन अर्जावर आता पुढील सुनावणी 14 मार्च रोजी होणार आहे. तोपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षणही मिळाले आहे.
 
कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिदिं एकबोटे यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीसह एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून अटक टाळण्यासाठी एकबोटे यांनी आधी पुणे सत्र न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. 
 
या दोन्ही ठिकाणी एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.
 
दरम्यान, एकबोटे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असता त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 7 फेब्रुवारी रोजी सुनावणी होऊन त्यांना 20 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यात आले होते. 
 
ही मुदत संपत असताना पुन्हा सुनावणी झाली असता एकबोटे यांना नव्याने दिलासा मिळला आहे. एकबोटे यांचा अटकपूर्व अंतरिम जामीन 14 मार्चपर्यंत वाढवण्यात आला आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments