Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मेळघाटात भीषण दुष्काळ; अमरावतीत 11 गावांना टँकरने पाणी

Webdunia
शनिवार, 7 मे 2022 (21:47 IST)
विदर्भात सध्या सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे पाण्याचे जलस्त्रोत आटले असल्याने अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील लोकांची पाण्यासाठी वणवण  सुरू आहे. मेळघाटातील  चिखलदरा तालुक्यात 10 गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात एकूण 11 गावात टँकरने पाणी पुरवठा सध्या करण्यात येत आहे. मे महिन्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे.
 
तापमानवाढ व भूजलपातळी खोल गेल्याने उंचावरील खास करून मेळघाटातील गावांचे जलस्रोत कोरडे पडले आहेत. याकरिता काही योजना व विहीर अधिग्रहणासोबतच टँकरचे नियोजन केले असल्याचे प्रशासनाने सांगितले. मेळघाटातील 10 गावे सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करत असल्याने मे अखेरिस या ठिकाणी पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे.
 
जिल्ह्यात पाणी टंचाईसाठी नवीन नळयोजना, विहीर अधिग्रहण, विहिरींचे खोलीकरण, नळ योजनांची दुरुस्ती, नवीन नळ योजना घेणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण, नवीन विंधन विहिरी घेणे, हातपंपांची दुरुस्ती, टँकर किंवा बैलगाडीने पाणी पुरवठा करणे आदी उपाययोजना प्रस्तावित असून यावर काम सुरू असल्याचे पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

रेल्वेने बदलले 'वंदे मेट्रो'चे नाव,आता हे नाव असेल

दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, उद्या सकाळी 11 वाजता नाव जाहीर होणार!

भारतीय हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 4-1 ने पराभव केला

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात तक्रार दाखल

राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला11 लाख रुपये देण्याची घोषणा करणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड कोण आहेत ?

पुढील लेख
Show comments