Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरद पवार यांचा राज्यपालांना पत्रातून जोरदार टोला

Webdunia
गुरूवार, 29 ऑक्टोबर 2020 (08:16 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख करत पत्र पाठवले होते. त्या पत्राला पवार यांनी पत्राद्वारेच प्रत्युत्तर दिलंय. 
 
राज्याच्या राज्यपाल सचिवालयातर्फे नुकतंच 'जनराज्यपाल : भगतसिंह कोश्यारी' नावाचं एक कॉफीटेबल बुक प्रकाशित केलं आहे. दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी शरद पवार यांना कॉफी टेबल पुस्तक पाठवले होते. या पुस्तकाला अभिप्राय देताना खरमरीत पत्र लिहिलं आहे आहे. पवार म्हणतात की, पुस्तकात मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची व त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही. भारतीय संविधानात जनराज्यपाल असा उल्लेख आढळत नाही. तरीही राज्य शासनाच्या वतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधी प्रकाश टाकणारे कॉफी टेबल बुक पाठवण्यात आले याबद्दल धन्यवाद, अशी शेरेबाजी पवारांनी केली आहे.
 
पवार पुढे म्हणतात की, निधर्म वादासंदर्भात राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची आणि त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही. पुस्तकात एखाद-दुसरा प्रसंग वगळता शपथविधी स्वागत समारंभ दीक्षांत समारंभ सोहळे, उच्चपददस्थ गाठीभेटी सांस्कृतिक कार्यक्रम छायाचित्र आहेत. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments