Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह सुनावणी लांबवणी वर पडली

Webdunia
बुधवार, 11 ऑक्टोबर 2023 (21:14 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह पुकारलेलं बंडा नंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना आता सत्तेत सहभागी असली तर उद्धव ठाकरेंकडून मात्र त्यांना आव्हान दिलं जात आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिलं होतं. यानंतर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत आव्हान दिलं होतं. दरम्यान या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. पण आता ही सुनावणी लांबवणीवर पडली आहे.
 
नबाम रेबिया केसचा पुनर्विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शवली आहे. विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव असेल तर अध्यक्षांचे निर्णय बाधित होतात का यावर सुनावणी होणार आहे. उद्यापासून 7 न्यायमूर्तींच्या न्यायपिठासमोर प्रकरणाला सुरुवात होणार आहे. ठाकरे गटाने तेव्हा हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे द्यावे अशी विनंती केली होती.
 
सुप्रीम कोर्टातील सुनावणीत आता पुन्हा एकदा नबाम रेबिया प्रकरणाचा दाखला दिला जाणार आहे. वकील सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं की, "आज जी निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सुनावणी होणार होती, ती पुढे ढकलण्यात आली आहे. याचं कारण आज संसदीय खंडपीठ बसलेलं आहे. उद्धव ठाकरेंना पक्ष आणि चिन्ह मिळेल अशी आशा होती. पण आता ही सुनावणी लांबली आहे. पुढील तारीख 1 ते 2 महिन्यांनी येऊ शकते. यामुळे उद्धव ठाकरेंना लोकसभेआधी पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळेल अशी जी आशा होती. ती धूसर झाली आहे".
 
"दसरा, दिवाळीच्या सुट्ट्या यामुळे प्रकरण लांबू शकतं. आज सुनावणी झाली असती तर एक दोन महिन्यात निर्णयाची आशा होती," असं त्यांनी सांगितलं. जर एकाही आमदाराने अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला तर ते अपात्रतेबाबत निर्णय घेऊ शकत नाहीत हे नबाम रेबिया प्रकरणात झालं होतं. उद्या फक्त सुरुवात होणार आहे. त्यासाठी बराच वेळ लागू शकतो असंही त्यांनी सांगितलं आहे.






Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

कोरोना महामारीदरम्यान मृत्यू झालेल्या 5 कोरोना योद्ध्यांना दिल्ली सरकार प्रत्येकी 1 कोटी रुपये देणार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले

दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये प्रवाशांच्या जेवणात आढळले झुरळ

मुंबई सिनेट निवडणुकामध्ये शिवसेनाने यश मिळवला, ही तर विजयाची सुरुवात -आदित्य ठाकरे

अरविंद केजरीवाल लवकरच मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार

पुढील लेख
Show comments