Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भावानेच भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना

Webdunia
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (07:55 IST)
दुसरं लग्न केल्याच्या वादातून भावानेच भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना अमरावती शहरात घडली आहे. ही घटना अमरावती शहरातील हमलपुरा येथे  घडली आहे. कैलास मोहन अजबे (वय-38 रा. चिचफैल) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणात राजापेठ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सुनिल माणिक अजबे (वय-45 रा. हमालपुरा) त्याची आई व पत्नी यांना अटक केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, कैलास अजबे याने नुकतंच दुसरं लग्न केलं होतं. त्यामुळे दुसरं लग्न का केलं ? असा प्रश्न कैलास अजबे याला त्याच्या भावाकडून विचारला जात होता. याच मुद्यावरून झालेल्या वादात कैलास अजबे याला आपला जीव गमवावा लागला आहे.
 
पहिली पत्नी असताना तिला मुलबाळ होत नसल्याने कैलासने दुसरे लग्न केलं होतं. या मुद्यावर कुटुंबात तणावाचं वातावरण तयार झालं. रविवारी हा वाद टोकाला गेला आणि कैलासचा भाऊ सुनिल याच्याकडून नको ते घडलं. सुनिल याने कैलासवर केलेल्या हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती परिसरात पसरताच भीतीचं वातावरण तयार झालं आहे. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देऊन तिघांना अटक केली. 

संबंधित माहिती

Lok sabha elections 2024 : भाजपला आता आरएसएसची गरज नाही,उद्या ते आरएसएसला नकली म्हणतील- उद्धव ठाकरे

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments