Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काही अप्रिय घटना घडू नये : हायकोर्ट

Webdunia
शपथविधी कार्यक्रमाबद्दल आम्हाला काही म्हणायचे नाही. आमची प्रार्थना इतकीच आहे की काही अप्रिय घटना घडू नये अशी चिंता मुंबई हायकोर्टाने व्यक्त केली आहे. पण हायकोर्ट हा शपथविधी सोहळा थांबवू शकत नाही. मात्र, संबंधित यंत्रणांना सुरक्षेची खातरजमा करण्यास सांगू शकते, असेही खंडपीठाने म्हटले आहे.
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा गुरुवारी शिवाजी पार्कवर होत आहे. २०१० मध्ये मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई हायकोर्टाने ही काळजी व्यक्त केली आहे. २०१०मध्ये शिवाजी पार्कला शांतता क्षेत्र घोषित करण्यात यावे म्हणून वीकम ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेने कोर्टात याचिका दाखल केली होती.
 
त्यानंतर शिवाजी पार्क परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती आर. आय. छागला यांच्या खंडपीठाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक मैदानांवर अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा पायंडा पडू नये. नाहीतर जो तो उठेल आणि अशाप्रकारच्या कार्यक्रमांसाठी सार्वजनिक मैदानांचा वापर करेल, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.अजूनही काहीजण मैदानाचा अशा प्रकारे मैदानाचा वापर करण्यास मागणी करू शकतात, असे खंडपीठाने नमूद केले आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments