rashifal-2026

एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरु, अद्याप तोडगा नाही

Webdunia
मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (21:10 IST)
विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरु आहे. यावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. राज्य सरकारने संप मागे घेण्याचं आवाहन केलं असलं तरी कर्मचारी माघार घेण्यास तयार नाहीत. उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीबरोबर एसटी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.  राज्यात सुरु असलेल्या एसटी संपाचा तिढा सुटायला तयार नाही. विलिनीकरणासाठी नेमलेली समिती आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांमध्ये झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. विलिनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची भूमिका एस कर्मचारी संघटनांनी या बैठकीत घेतली, त्यामुळे संपाचा तिढा सुटण्याऐवजी उलट वाढला आहे.
राज्यातील एसटी कर्माचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देऊन एसटीचं राज्य शासनात विलीनीकरणं करणं ही एकमेव मागणी आहे. जोपर्यंत मागणी मान्य करत नाही तोपर्यंत संप सुरुच राहणार असल्याचं एसटी कर्मचारी संघटनेचं म्हणणं आहे.
 
 एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. मी संपकरी कर्मचाऱ्यांना हेच सांगतोय, आपला जो प्रश्न आहे तो चर्चेच्या माध्यमातून मांडला पाहिजे, विलीनीकरणाचा मुद्दा हा उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या समोर आहे. त्या व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यासाठी चर्चेचे दरवाजे खुले आहेत असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी आवाहन केलं आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

जंगलातील आगी रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर- वनमंत्री गणेश नाईक विधानसभेत म्हणाले

अशोक चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांना मोठी जबाबदारी, मैत्री गटांचे नेतृत्व करणार

परिचारिका आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सहा महिन्यांच्या बाळाचे बोट कापले गेले; रुग्णालय व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल

LIVE: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा पिवळा इशारा जारी

"मदरसे बंद करा, ते दहशतवाद्यांना जन्म देतात," मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान

पुढील लेख
Show comments