Marathi Biodata Maker

राज्य मंत्रिमंडळात फेरबदल

Webdunia
शुक्रवार, 7 जून 2019 (17:07 IST)
राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार पुणे आणि जळगावच्या पालकमंत्र्यांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यामुळे गिरीश बापट हे खासदार बनले आहेत. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्रीपद सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 
 
गिरीश बापट यांच्याकडे पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासह, अन्न व औषध पुरवठा आणि संसदीय कामकाजमंत्रीपदाचीही जबाबदारी होती. आता, मंत्रीमंडळातील फेरबदलानुसार, अन्न व औषध पुरवठा विभागाचा भार पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे देण्यात आला आहे. तर, संसदीय कामकाममंत्रीपदाची जबाबदारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दिली आहे. दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांच्याकडून जळगावचे पालकमंत्रीपद काढून घेण्यात आले असून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना ती जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे महाजन यांच्याकडे जळगाव आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे. दरम्यान, या पत्रकार परिषदेत बोलताना, मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँकांना सक्त ताकीद देण्यात आल्याचे म्हटले आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: मालाड येथे अघोरी पूजा आणि जादूटोणा केल्याप्रकरणी भोंडुबाबा रिदम पांचालच्या विरोधात गुन्हा दाखल

लग्नाच्या रात्री वधू चोरी करून पळून जायची; अविवाहित पुरुषांना लक्ष्य करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कांद्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी एक मोठी योजना: आता महाराष्ट्रात कांदा पावडरचे उत्पादन होणार

नांदेडमध्ये नाल्यात बुडून चार मुलांचा मृत्यू

लखनौमध्ये भीषण आग, सिलिंडरच्या स्फोटांनी २०० झोपड्या जळून खाक, २ मुलांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments