Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तापमानातील वाढ कायम, काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा

Webdunia
शुक्रवार, 29 मार्च 2019 (09:48 IST)
राज्यात या आठवडय़ाच्या सुरुवातीपासूनच कमाल आणि किमान तापमानात झपाटय़ाने वाढ सुरू झाली. मागील तीन ते चार दिवसांपासून तापमानातील वाढ कायम आहे. नगर येथे गुरुवारी राज्यातील उच्चांकी ४२.३ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ सोलापूर येथे ४२.२ तापमान नोंदविण्यात आले. या दोन्ही शहरांसह जळगाव, मालेगाव, सांगली, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ आदी ठिकाणी तापमान ४० ते ४१ अंशांवर पोहोचले आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, नागपूर, वाशिम आदी ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या अगदी जवळ आहे. 
 
राज्यात पुढील चार ते पाच दिवस उन्हाचा चटका आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे शनिवारपासून कोकण विभाग वगळता इतर ठिकाणी पावसाला पोषक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि उस्मानाबाद काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

LIVE: बुलढाण्यात भीषण रस्ता अपघात

अमेरिकेने उचलले मोठे पाऊल, संगणक चिप आणि औषधांच्या आयातीची चौकशी सुरू

एमबाप्पेला मिळाले सहा वर्षांत पहिले रेड कार्ड, रिअल माद्रिदने अलाव्हेजवर 1-0 असा विजय मिळवला

मुंबईहून गोव्यात अवघ्या काही तासांत पोहचता येईल, नितीन गडकरींनी दिली आनंदाची बातमी

उत्तर-मध्य नायजेरियात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात चाळीस जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments