Dharma Sangrah

राज्यात थंडीचा कडाका कायम

Webdunia
सोमवार, 31 डिसेंबर 2018 (17:06 IST)
राज्यात थंडीचा कडाका कायम आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या बहुतांश भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट, तर कोकणात लक्षणीय घट झाली. मध्य महाराष्ट्रातील थंडीची लाट तीव्र बनली असून, नगर 4.5, पुणे 6, नाशिक 7 अंश सेल्सिअस अशी किमान तापमानाची नोंद झाली. दरम्यान, नागपुरात थंडीने गारठून दोघांचा मृत्यू झाला.
 
उत्तर भारतातून राज्याच्या दिशेने येणार्‍या थंड वार्‍यांचा प्रभाव वाढला आहे. बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात कमी दाबाची क्षेत्रे किंवा द्रोणीय स्थिती सध्या अस्तित्वात नाही.राज्यातील वातावरण निरभ्र असून, या सर्व स्थितीमुळे कोकण, मुंबईसह संपूर्ण राज्य थंडीने गारठल्याचे दिसते. दरम्यान, राज्यातील नीचांकी किमान तापमानाची नोंद विदर्भातील नागपूर येथे 4 अंश सेल्सिअस एवढी करण्यात आली. तर गोंदिया 5.2, वर्धा 7.5, अकोला 5.9 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. येत्या 48 तासांत विदर्भात थंडीची तीव्रता आणखी वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

NZ vs CAN: न्यूझीलंडने कॅनडाला आठ विकेट्सने हरवून सुपर एटमध्ये प्रवेश केला

हिंदूंना तीन मुले असली पाहिजेत, आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले.....

LIVE: सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली

मुंबई : हवामान सप्ताहात नैतिक जबाबदारीवर मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले विचार व्यक्त केले

T20 World Cup झिम्बाब्वे सुपर एटमध्ये पोहोचला, ऑस्ट्रेलिया बाहेर पडला

पुढील लेख
Show comments