Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात थंडीचा कडाका कायम

Webdunia
सोमवार, 31 डिसेंबर 2018 (17:06 IST)
राज्यात थंडीचा कडाका कायम आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या बहुतांश भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट, तर कोकणात लक्षणीय घट झाली. मध्य महाराष्ट्रातील थंडीची लाट तीव्र बनली असून, नगर 4.5, पुणे 6, नाशिक 7 अंश सेल्सिअस अशी किमान तापमानाची नोंद झाली. दरम्यान, नागपुरात थंडीने गारठून दोघांचा मृत्यू झाला.
 
उत्तर भारतातून राज्याच्या दिशेने येणार्‍या थंड वार्‍यांचा प्रभाव वाढला आहे. बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात कमी दाबाची क्षेत्रे किंवा द्रोणीय स्थिती सध्या अस्तित्वात नाही.राज्यातील वातावरण निरभ्र असून, या सर्व स्थितीमुळे कोकण, मुंबईसह संपूर्ण राज्य थंडीने गारठल्याचे दिसते. दरम्यान, राज्यातील नीचांकी किमान तापमानाची नोंद विदर्भातील नागपूर येथे 4 अंश सेल्सिअस एवढी करण्यात आली. तर गोंदिया 5.2, वर्धा 7.5, अकोला 5.9 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. येत्या 48 तासांत विदर्भात थंडीची तीव्रता आणखी वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments