Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अन्नदात्याने ताकद दाखवावी; शिवसेना पाठीशी

Webdunia
शनिवार, 2 डिसेंबर 2023 (12:33 IST)
मुंबई : दुष्काळ आणि पीकविमा न मिळाल्याने हिंगोलीतील शेतकऱ्यांनी अवयव विक्रीला काढल्याची जाहिरात दिली होती. बँकांचे पीक कर्ज फेडण्यासाठी आपले किडनी डोळे, लिव्हर असे अवयव विक्रीला काढले होते. मुंबईमध्ये या शेतकऱ्यांनी लक्षवेधी आंदोलनही केले. शुक्रवार, १ डिसेंबर रोजी या शेतकऱ्यांनी मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणले की, हे सरकार सगळच विकत आहे, या सरकारच करायच तरी काय? अन्नदात्याने त्यांची ताकद दाखवावी शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे.
 
जे शेतकरी मातोश्रीवर येऊन गेले त्यांना अटक झाल्याच समजले. त्यांचा काय गुन्हा होता, का अटक केली? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. ही शेतकऱ्यांची खरी परिस्थिती आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यात नव्हते. स्वतः चे राज्य सोडून दुसऱ्याची धुणी धुवायला गेले. अशा सरकारला नालायक म्हटल तर मिरच्या झोंबल्या, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हार्दिक पंड्या जगातील नंबर वन T20 अष्टपैलू खेळाडू बनला

Zika Virus: झिका व्हायरसबाबत अलर्ट, केंद्र सरकारने सर्व राज्यांसाठी ॲडव्हायझरी जारी केली

बुलढाण्यात अनियंत्रित कारची वृद्धाला धडक लागून दुर्देवी मृत्यू

अजित पवारांच्या बैठकीत नवाब मालिकांची उपस्थिती, भाजप आणि शिवसेनेचा आक्षेप

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक मुंबईतील कॉलेजमध्ये 'ड्रेस कोड' लागू करण्याच्या निर्णयावर नाराज

सर्व पहा

नवीन

विधानपरिषद निवडणुकीत नवाब मालिकांचे मत मोलाचे का?

ऑनलाईन बुक सेलर, 72 कोटी डॉलर्सचा तोटा ते जगातील सर्वांत मोठी ई-कॉमर्स कंपनी; ॲमेझॉनचा प्रवास

विश्वविजेता भारतीय संघ बार्बाडोसहून भारताकडे रवाना

अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालय 5 जुलै रोजी निकाल देणार, न्यायालयीन कोठडीत वाढ

'आमचा संघर्ष संपला नाही, आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये...', भाजपाला घेरत नाना पटोलेंचा मोठा दावा

पुढील लेख
Show comments