Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकार म्हणजे अलीबाबा आणि चाळीस चोरांची टीम किरीट सोमय्या

Webdunia
मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (15:52 IST)
शरद पवारांच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांनी शेतकऱ्यांचे सहकारी साखर कारखाने हडप केले,’ असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले.‘तर, उद्धव ठाकरे यांचं सरकार म्हणजे अलीबाबा आणि चाळीस चोरांची टीम आहे,’ असा घणाघात त्यांनी केला.महाविकास आघाडी सरकारमधील नेते व मंत्र्यांच्या विरोधात नेहमी नवनवीन आरोप करणारे किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी व शिवसेनेला लक्ष्य केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले. सोमय्या यांनी  शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून महाआघाडी सरकारला लक्ष्य केलं. ‘महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त व्हावा, अशी प्रार्थना साई चरणी केल्याचं त्यांनी सांगितलं. साईबाबांचा आशीर्वाद घेतल्यामुळं माझ्या कामाला आणखी गती मिळेल, असंही ते म्हणाले.
‘राज्यत्री प्राजक्त तनपुरे यांनी राम गणेश गडकरी साखर कारखाना शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली बेनामी पद्धतीने घेतला. कारखान्याची जमीन अनिल देशमुखांना हस्तांतरित केली, हे काय गौडबंगाल आहे, याची चौकशी सुरू आहे,’ असं सोमय्या म्हणाले. ‘
माझ्या घरी ईडीची धाड पडणार आहे. केंद्रीय यंत्रणांनी माझ्याविरोधात कारवाई करावी, म्हणून देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करत आहेत,’ असं ट्वीट नवाब मलिक यांनी आज केलं आहे. त्यावर सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली. ‘मालाचा हिशोब
घेण्यासाठी कोणी घरी येईल का, याची भीती त्यांना वाटत असेल. पण ज्यांनी चोरी केली त्यांच्यावर कारवाई होणारच, असं सोमय्या म्हणाले.उद्धव ठाकरे यांचं मंत्रिमंडळ म्हणजे आलिबाबा चाळीस चोरांची टीम आहे. एक जण शंभर कोटीच्या
वसुलीमध्ये तुरुंगात आहे. दुसरा कार्यकर्त्यांचे अपहरण करतो, म्हणून जामिनावर आहे. आनंदराव अडसूळ यांच्यावर ९८० कोटी रुपयांच्या बँक घोटाळा प्रकरणी वारंट निघालं असून साडेतीन महिन्यांपासून ते हॉस्पिटलमध्ये बसून आहेत. परिवहन मंत्री
अनिल परब हे बेकायदेशीर रिसॉर्ट बांधण्यात व्यस्त आहेत. केवळ मुख्यमंत्रीच घरी बसले आहेत, असं नाही तर या सरकारचे सगळेच मंत्री कोमामध्ये आहेत. सगळे मंत्री पैसे मोजण्यात व्यस्त आहेत. न्यायालयाच्या आशीर्वादानं धाडी सुरू आहेत, पैसे जप्त करण्याचं काम सुरू आहे,’ असं सोमय्या म्हणाले.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments