Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तरुणीची मान बिबट्याच्या जबड्यात होती, तिने बिबट्याच्या डोक्यावर कळशीने वार केले, धाडसाची कमाल

Webdunia
मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (11:58 IST)
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे घडलेल्या एक थरारक घटनेत तरुणीच्या धाडसामुळे तिचा जीव वाचला. वृषाली नावाच्या या धाडसी तरुणीची सर्वत्र चर्चा होत आहे. तिने बिबट्याच्या जबड्यातून स्वत:ची मान सोडवून कमाल धाडस दाखवलं.
 
नेमकं काय घडलं?
वृषाली नीळकंठराव ठाकरे करंजखेड येथील रहिवासी आहे. वृषाली फार्मसीची विद्यार्थिनी आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सोमवारी वृषाली आईसोबत आपल्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेली होती. दरम्यान पिण्याचं पाणी आणण्यासाठी वृषाली एकटीच शेताजवळच्या ओढ्यावर गेली. कळशी भरून पाणी घेऊन परत येत असताना पाठीमागून बिबट्याने अचानक वृषालीवर हल्ला केला.
 
बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यामुळे काही कळायच्या आत वृषालीची मान बिबट्याच्या जबड्यात गेली. मात्र बिबट्यासोबत झालेल्या झटापटीतही वृषालीने प्रसंगावधान दाखवत हातातील कळशीने बिबट्याच्या डोक्यावर अनेक वार केले. एका पाठोपाठ दणके डोक्यावर बसल्यानंतर बिबट्या भांबावून गेला आणि काही सेकंदानंतर बिबट्याने माघार घेतली. बिबट्याने वृषालीची मान जबड्यातून सोडली आणि नंतर जंगलाच्या दिशेनं पोबारा केला.
 
या झटापटीत वृषालीच्या अंगावर काही ठिकाणी जखमा झाल्या असून पायाला मोठी दुखापत झाली आहे. ही घटना लक्षात येताच तिला लगेच पुसद येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलं. तरुणीनं धाडस दाखवल्याने तिचा जीव वाचला अशात तिच्या धाडसाची सर्वत्र चर्चा होत आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments