Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देशातील सर्वात अनोखे गाव, प्रत्येक घरात साप पाळले जातात

Webdunia
गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (23:17 IST)
भारत हा विविधतेने भरलेला देश आहे. येथील गावांचे सौंदर्य आणि त्यांचे वेगळेपण कधी कधी लोकांना थक्क करून टाकते.
महाराष्ट्रातील पुण्यापासून सुमारे 200 किमी अंतरावर सोलापूर जिल्ह्यात एक गाव आहे जिथे प्रत्येक घरात साप पाळले जातात. एवढेच नाही तर या गावातील मुले सापांसोबत खेळतात. या गावात बऱ्याच वर्षांपासून सापाची पूजा करतात.म्हणूनच या गावातील प्रत्येक घरात सापाला विशेष महत्त्व आहे. या गावातील लोक सापाला आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सांभाळतात. आश्‍चर्याची बाब म्हणजे या गावात आजपर्यंत एकाही व्यक्तीला साप चावला नाही

हे गाव आहे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील शेतपाळ.येथे गावातील  प्रत्येक घरात साप ठेवण्यात आले आहेत. इतकंच नाही तर काही घरांमध्ये कोब्राही पाळले जातात आणि हे सर्व साप घरात उपस्थित असलेल्या मुलांसोबत खेळतानाही दिसतात. या गावात साप राहण्यासाठी वारुळे देखील आहेत. इथले हवामान कोरडे असल्यामुळे सापांना राहण्यासाठी हे वातावरण योग्य असते. या गावात पाळीव प्राण्यांप्रमाणे साप घरात फिरत असतात. आजूबाजूच्या या अनोख्या गावातील लोक अनेकदा येथे पोहोचतात आणि हे दृश्य पाहण्यासाठी जातात.

गावात सुमारे 2600 ग्रामस्थ राहत असून या सर्व गावकऱ्यांना आजपर्यंत साप चावलेला नाही आणि याआधी या गावात कोणालाही साप चावला नसल्याचे सांगितले जाते. यासोबतच घरात सापांना राहण्यासाठी स्वतंत्र जागा तयार करण्यात आली आहे. ही जागा घराच्या छतावर बांधलेली आहे, याला देवस्थान म्हणतात. पूजेचा सण आला की गावातील लोक पूर्ण विधीपूर्वक नागांची पूजा करतात. गावात अनेक नाग मंदिरे आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रोहित शर्मा : टी20 कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारा, भारतासाठी आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवणारा कर्णधार

तुमच्या नाभीत घाण कशी आणि कुठून तयार होते, माहित आहे का?

रोहित शर्मा : 'टॅलेंट ते वाया गेलेलं टॅलेंट' आणि आता 'जगज्जेता कर्णधार', असा आहे 'हिटमॅन'चा प्रवास

मुलाला विष पाजल्यावर स्वतः गळफास घेऊन महिलेची आत्महत्या

महायुतीचे सर्व पक्ष एकत्र येऊन विधानसभा निवडणूक लढवणार-चंद्रशेखर बावनकुळे

सर्व पहा

नवीन

वर्गशिक्षिकाने विद्यार्थ्याला घरी बोलावून प्रॅक्टिकलच्या नावाखाली हे केले काम, कारवाई करण्याची मागणी

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी T20I क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

पराभवाच्या जबड्यातून विजय खेचून आणत टीम इंडिया ठरली चॅम्पियन, 'इथे' मॅच फिरली

विराट कोहली : सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या जगातील एकमेव खेळाडूचा प्रवास

ओम बिर्ला : लोकसभा अध्यक्षपदाच्या सलग दुसऱ्या कार्यकाळाचीही वादानं सुरुवात

पुढील लेख
Show comments