कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील आणि ठाणे महापालिका हद्दीतील दिवा-आगासन रोडवर साईबाबा नगर येथे खड्डे असल्यामुळे गणेश फाले(वय 22) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.याचे सीसीटीव्ही समोर येताच मनसेने (MNS)आक्रमक पवित्रा घेत दिव्यातील प्रभाग समिती कार्यालय गाठत सहाय्यक आयुक्त यांना पत्र दिले आणि जाब विचारला.मात्र सहाय्यक आयुक्त फारुख शेख यांच्याकडून ठोस उत्तर न मिळाल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.यावेळी दिव्यातील वाहनचालकांना साहसी चालकांचा दर्जा द्या,मरण पावलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना तातडीने दहा लाखांची मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.