Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पावसाळी अधिवेशन : पदभरतीमध्ये दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना प्राधान्य

Webdunia
गुरूवार, 27 जून 2019 (08:40 IST)
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने दुष्काळग्रस्त भागातील १२ जिल्ह्यामध्ये रिक्त चालक तथा वाहक पदासाठी  एकूण ४४१६ पदांसाठी व कोकण प्रदेशातील जिल्हे वगळून इतर ९ जिह्यात ३६०६ अशा एकूण ८०२२ चालक तथा वाहक रिक्त जागा भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये लेखी परीक्षेत समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांचा गुणवत्ता क्रम लावताना दुष्काळ ग्रस्त जिह्यातील उमेदवारांना तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज विधान परिषद व विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. सन २०१६-१७ मधील चालक तथा वाहक पदाची वाहन चालन चाचणी उत्तीर्ण असलेल्या ९४५ व किरकोळ त्रुटींचा फेर तपासणीअंती पात्र ठरलेल्या व वाहन चाचणी उत्तीर्ण झालेल्या ८७८ असे एकूण १८२३ उमेदवारांना कोकण प्रदेशांतर्गत विभागात सामावून घेण्यात येणार असल्याचे रावते यांनी निवेदनाद्वारे सांगितले.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments