Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आंदोलकांनी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक व जाळपोळ केली

Webdunia
सोमवार, 30 ऑक्टोबर 2023 (14:48 IST)
मराठा आंदोलनाला आता राज्यात वेगळे वळण आले आहे. आंदोलकांनी राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेच्या घरावर दगडफेक आणि जाळपोळ केली. आणि घराजवळ उभ्या असलेल्या गाड्याही फोडल्या. आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंकी यांच्या निवासस्थानाची तोडफोड करून ते पेटवून दिले. 
या घटनेवर प्रकाश सोळंकी यांचे वक्तव्यही आले आहे. आंदोलकांनी घराची तोडफोड केल्यानंतर आग लावली तेव्हा तो घरातच होता, असे त्याने सांगितले. मात्र, या जाळपोळीत त्यांच्या कुटुंबातील कोणीही जखमी झाले नाही. त्यांनी सांगितले की सर्वजण सुरक्षित आहेत पण आगीमुळे मालमत्तेचे बरेच नुकसान झाले आहे.
 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "मनोज जरंगे पाटील यांनी आपल्या उपोषणादरम्यान आंदोलन कुठे चालले आहे ते पहावे. ते चुकीच्या दिशेने वळत आहेत."
 
 आज दुपारी (30 ऑक्टोबर) 2 वाजता जरांगे पाटीलांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. आंदोलकांनी त्यांना पाणी पिण्याची कळकळीची विनंती केली. त्यानंतर त्यांनी चार पाच घोट पाणी पिण्याची तयारी दर्शवली.
 
ते म्हणाले, “राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्र्यांशी बोलणे करून देणार होते पण पुढे काय झाले माहिती नाही. समितीचा प्रथम अहवाल स्वीकारल्याचे त्यांनी सांगितलं. राज्यातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना बोलवावं आणि आणि सापडलेल्या पुराव्या आधारे प्रमाणपत्र द्या असे त्यांनी सांगितलं आहे.”
 
मी आंदोलन थांबवणार नाही. महाराष्ट्रातले कलेक्टर बोलवून सरसकट सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्यावे लागेल असे संगीतले आहे मी. तसंच सरकारला म्हणजे थोडा किती वेळ द्यायला पाहिजे ते स्पष्ट करा. पोलिसांनी मराठयांच्या मुलांना त्रास दिला तर मी सगळ्यांना घेऊन तिथं जाईल. मराठे भरकटत चाललेले नाही.कुणीतरी आंदोलनाला गालबोट लावत आहे.” असंही ते म्हणाले.
 
सरकारने त्यांनी लोक संभाळावीत. मुख्यमंत्री उप मुख्यमंत्र्यांनी त्यांची लोक आवरावीत. मराठ्यांना आडवं बोललं तर ते कसे सोडतील? असं जरांगे पाटील म्हणाले.
 
शांततेत असलं तरी पुढचं आंदोलन सरकारला जड जाईल असा इशारा त्यांनी दिला.
 
तत्पूर्वी सह्याद्री अतिथीगृह येथे मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या समितीची आज 30 ऑक्टोबर रोजी बैठक झाली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीसाठी उपस्थित होते.
 
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने ही बैठक बोलावण्यात आली होती. एकाबाजूला निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी पुराव्यांची पडताळणी करण्याचं काम करत आहे तर दुसरीकडे मराठा उपसमितीच्या बैठकीत न्यायमूर्ती शिंदे समितीच्या कामाचा आढावा आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्याबाबत चर्चा करण्यात आली.
 
 
 Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रोहित शर्मा, विराट कोहली आणि जडेजाची जागा घेऊ शकतात 'हे' तरुण चेहरे

कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले

Contact आणि Connection मध्ये नेमका काय फरक ?

पोट दुखी, अतिसार...विहिरीचे पाणी पिल्याने एकाच गावातील 93 लोकांची प्रकृती बिघडली

Ratnagiri : मुसळधार पावसानंतर 8 फूट लांबीची मगर रस्त्यावर रेंगाळताना दिसली

सर्व पहा

नवीन

इंटरनॅशनल जोक्स डे

PoK तुरुंगातून 20 दहशतवादी पळाले, एकाचा मृत्यू झाला, 19 चा शोध सुरू

महायुति सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले, सीएम शिंदेंचा MVA वर कटाक्ष

Majhi Ladki Bahin Yojana 2024 महाराष्ट्र सरकार महिलांना दरमहा 1500 रुपये देणार, याप्रमाणे अर्ज करा

महाराष्ट्र कृषी दिन

पुढील लेख
Show comments