Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बॅाश कंपनीचा धक्कादायक निर्णय; एकाच वेळी ७३० ओजीटी कामगारांना दिला ब्रेक

Webdunia
शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (08:02 IST)
नाशिक येथे  बॅाश कंपनीतील सुमारे ७३० ओजीटी कामगारांना  ब्रेक दिला. त्यामुळे कामगारांध्ये खळबळ निर्माण झाली आहे. याबाबत कंपनीने अधिकृत माहिती दिली नसली तरी या कामगारांनी थेट कामगार उपायुक्त कार्यालयात निवेदन दिल्यामुळे ही बाब समोर आली आहे. 

कोरोना काळात सर्वच ठिकाणी कामगार व पगार कपात होत असतांना बॅाश कंपनीने पगारवाढ करुन सर्वांना धक्का दिला होता. पण, त्यानंतर दुस-याच महिन्यात कंपनीने सुमारे साडेपाचशे कामगारांना व्हिआरएस दिले. त्यानंतर आता ही मोठी कामगार कपात केली आहे. आता कमी केलेले कामगार हे कायमस्वरुपी नसले तरी ते गेल्या काही वर्षापासून कंपनीत काम करत होते.आज त्यांना पहिल्याच शिप्टपासून ब्रेक देण्यात आला. त्यामुळे सकाळी साडेअकरा वाजेला सर्व ओजीटी कामगार ईएसआयसी ग्राउंडवर एकत्र आले. त्यानंतर त्यांनी चर्चा केली व त्यानंतर त्यांनी कामगार उपायुक्त कार्यालयावर जाऊन निवेदन दिले.कामगारांना कमी करुन शिका आणि कमवा या योजनेचे कामगार भरती करण्यावर कंपनीचा आता भर असणार असल्याचे बोलले जात आहे. या कामगारांना ईएसआयसी. पीएफ सह इतर सुविधा लागु असणार नाही. केवळ आठ ते दहा हजार रूपये टायपेन देवून तीन शिप्ट मध्ये या कामगारांकडून उत्पादन केले जाणार असल्याचीही चर्चा आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments