Marathi Biodata Maker

बॅाश कंपनीचा धक्कादायक निर्णय; एकाच वेळी ७३० ओजीटी कामगारांना दिला ब्रेक

Webdunia
शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (08:02 IST)
नाशिक येथे  बॅाश कंपनीतील सुमारे ७३० ओजीटी कामगारांना  ब्रेक दिला. त्यामुळे कामगारांध्ये खळबळ निर्माण झाली आहे. याबाबत कंपनीने अधिकृत माहिती दिली नसली तरी या कामगारांनी थेट कामगार उपायुक्त कार्यालयात निवेदन दिल्यामुळे ही बाब समोर आली आहे. 

कोरोना काळात सर्वच ठिकाणी कामगार व पगार कपात होत असतांना बॅाश कंपनीने पगारवाढ करुन सर्वांना धक्का दिला होता. पण, त्यानंतर दुस-याच महिन्यात कंपनीने सुमारे साडेपाचशे कामगारांना व्हिआरएस दिले. त्यानंतर आता ही मोठी कामगार कपात केली आहे. आता कमी केलेले कामगार हे कायमस्वरुपी नसले तरी ते गेल्या काही वर्षापासून कंपनीत काम करत होते.आज त्यांना पहिल्याच शिप्टपासून ब्रेक देण्यात आला. त्यामुळे सकाळी साडेअकरा वाजेला सर्व ओजीटी कामगार ईएसआयसी ग्राउंडवर एकत्र आले. त्यानंतर त्यांनी चर्चा केली व त्यानंतर त्यांनी कामगार उपायुक्त कार्यालयावर जाऊन निवेदन दिले.कामगारांना कमी करुन शिका आणि कमवा या योजनेचे कामगार भरती करण्यावर कंपनीचा आता भर असणार असल्याचे बोलले जात आहे. या कामगारांना ईएसआयसी. पीएफ सह इतर सुविधा लागु असणार नाही. केवळ आठ ते दहा हजार रूपये टायपेन देवून तीन शिप्ट मध्ये या कामगारांकडून उत्पादन केले जाणार असल्याचीही चर्चा आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

आयसीसी टी20 विश्वचषकासाठी तिकिटांची खिडकी उघडली, प्रेक्षकांचा प्रचंड उत्साह

LIVE: काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी राजीनामा दिला

शरद पवार 85 वर्षांचे झाले, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, राहुल गांधी आणि इतर मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या

शशी थरूर राहुल गांधींच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, कारण जाणून घ्या?

चॅटजीपीटीच्या सांगण्यावरून मुलाने केली आईची निर्घृण हत्या, नंतर स्वतःला संपवले

पुढील लेख
Show comments