Festival Posters

विशाळगडावरील बुरुज ढासळला; वाहतुक बंद

Webdunia
शुक्रवार, 15 जुलै 2022 (13:02 IST)
आठवडाभरापासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे नदी- नाले तुडुंब वाहू लागले आहे. परिणामी अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळपासून नदी काठच्या नागरीकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान आज सकाळी विशाळगडावर जात असलेल्या लोखंडी जिन्याच्या बाजूचा दगडी बुरुज ढासळला आहे. त्यामुळे लोखंडी जिन्यावरील वाहतूक बंद करण्यात आली असून पर्यायी वाटेने नागरीकांनी गडावर प्रवेश करावा अशा सूचना शाहुवाडी पोलीसांनी दिल्या आहेत.
 
विशाळगडाला ऐतिहासिक महत्व आहे. हा प्राचिन किल्ला कोकणातील बंदरे व कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणाऱ्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधला गेला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी पन्हाळ्याचा सिध्दी जोहरचा वेडा फोडून विशाळगडाचा आधार घेतला होता. गजापूर या गावापासून सुमारे चार किलो मीटरच्या अंतरावर पावनखिंड आहे. याच पावनखिंडीत नववीर बाजीप्रभू देशपांडे यांनी फक्त 300 मावळ्यांच्या साह्याने पराक्रम मिळविला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

आसाममधील ब्रह्मपुत्र नदीत बोट उलटली, चार मुलांसह सहा जण बेपत्ता

LIVE: महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांसाठी पावसाचा पिवळा इशारा जारी

मुंबई आणि नवी मुंबई विमानतळादरम्यान प्रवास करणे सोपे होईल; फडणवीस सरकारने मेट्रो लाईन ८ ला मान्यता दिली

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप, काँग्रेस निवडणूक आयोगाकडे गेली

महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य; आदेशाचे पालन करत आहे का? शिक्षण विभागाने अहवाल मागवला

पुढील लेख
Show comments