Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यावरील पाणी संकट अधिक तीव्र होणार

Webdunia
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018 (09:46 IST)
पाणी कपातीचा सामना करणार्‍या पुणेकरांवर आता अधिक त्रास होणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार 2017 सालाच्या लोकसंख्येनुसार प्रतिदिन 650 एमएलडी, म्हणजेच सध्याच्या वापरापैकी निम्मेच पाणी मिळणार असल्याने, पुण्यावरील पाणी संकट अधिक तीव्र होणार आहे. आदेशाची प्रत मिळताच जलसंपदाकडून अंमलबजावणी होणार आहे. या आदेशाविरोधात महापालिकेला उच्च न्यायालयातच दाद मागावी लागणार आहे.
 
पुण्यातील लोकसंख्येसाठी ठरवून देण्यात आल्यापेक्षा जादा पाणी वापर होत असल्याने, शेतीसाठी कमी पाणी मिळत असल्याबाबत बारामती येथील शेतकरी विठ्ठल जराड यांनी जलसंपदा विभागात याचिका दाखल केली होती. महापालिकेने 2017 मध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये शहराची लोकसंख्या 40 लाख 76 हजार असल्याची नोंद होती. प्रतिमाणशी प्रतिदिन 155.25 लिटर पाणी, या निकषानुसार एवढ्या लोकसंख्येला प्रतिदिन 650 एमएलडी पाणी पुरेसे असल्याचा दावा जराड यांनी याचिकेत केला होता. यावर मुख्य अभियंता टी. एन. मुंडे यांच्यासमोर सुनावणी झाली.  जराड यांची मागणी ग्राह्य धरून महापालिकेने 650 एमएलडी इतकेच पाणी घेण्याचा निकाल मुंडे यांनी दिला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

पुणे : वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू, उपमुख्यमंत्री पवारांनी दिले चौकशीचे आदेश

अयोध्येत रामलल्लाच्या जन्मोत्सवाची भव्य तयारी

National Maritime Day 2025 : राष्ट्रीय सागरी दिन माहिती

LIVE: काँग्रेसचे माजी आमदार यांनी राजीनामा दिला

LSG vs MI : लखनौने मुंबई इंडियन्सविरुद्ध आपले वर्चस्व कायम ठेवले

पुढील लेख
Show comments