Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यावरील पाणी संकट अधिक तीव्र होणार

Webdunia
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018 (09:46 IST)
पाणी कपातीचा सामना करणार्‍या पुणेकरांवर आता अधिक त्रास होणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार 2017 सालाच्या लोकसंख्येनुसार प्रतिदिन 650 एमएलडी, म्हणजेच सध्याच्या वापरापैकी निम्मेच पाणी मिळणार असल्याने, पुण्यावरील पाणी संकट अधिक तीव्र होणार आहे. आदेशाची प्रत मिळताच जलसंपदाकडून अंमलबजावणी होणार आहे. या आदेशाविरोधात महापालिकेला उच्च न्यायालयातच दाद मागावी लागणार आहे.
 
पुण्यातील लोकसंख्येसाठी ठरवून देण्यात आल्यापेक्षा जादा पाणी वापर होत असल्याने, शेतीसाठी कमी पाणी मिळत असल्याबाबत बारामती येथील शेतकरी विठ्ठल जराड यांनी जलसंपदा विभागात याचिका दाखल केली होती. महापालिकेने 2017 मध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये शहराची लोकसंख्या 40 लाख 76 हजार असल्याची नोंद होती. प्रतिमाणशी प्रतिदिन 155.25 लिटर पाणी, या निकषानुसार एवढ्या लोकसंख्येला प्रतिदिन 650 एमएलडी पाणी पुरेसे असल्याचा दावा जराड यांनी याचिकेत केला होता. यावर मुख्य अभियंता टी. एन. मुंडे यांच्यासमोर सुनावणी झाली.  जराड यांची मागणी ग्राह्य धरून महापालिकेने 650 एमएलडी इतकेच पाणी घेण्याचा निकाल मुंडे यांनी दिला होता.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments