Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तेव्हा उद्धव ठाकरे कॅमेरा घेऊन जंगलात फिरत होते : निलेश राणे

Webdunia
बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (15:41 IST)
राजकारणात आम्ही इन्क्युबेशन सेंटर म्हणजेच उबवणी केंद्र उघडले होते. परंतु आम्ही नको ती अंडी उबवली असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणै दौऱ्यात एका कार्यक्रमात केलं. मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता हा भाजपला टोला लगावला आहे. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपशी युती ही बाळासाहेबांनी जपली आहे. तेव्हा उद्धव ठाकरे कॅमेरा घेऊन जंगलात फिरत होते असा घणाघात निलेश राणेंनी केला आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्ही नको ती अंडी उबवली त्याचे पुढे काय झाले तुम्ही बघता आहात असे वक्तव्य करत भाजपवर निशाणा साधला होता. यावर निलेश राणेंनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पलटवार केला आहे. मुख्यमंत्री काय बोलतात हे कळण्यासाठी ट्रान्सलेटरची गरज लागते. भाजपशी युती ही बाळासाहेबांनी जपली आहे. २५ वर्षे बाळासाहेबांनी युती जपली, त्यावेळी १९९५ पर्यंत उद्धव ठाकरे जंगलात कॅमेरा घेऊन फिरत होते. त्यावेळी ते राजाकारणात कुठेच नव्हते. त्यांचा संबंध कुठेच नव्हता मग भाजपशी उद्धव ठाकरे यांचा संबंध काय? असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments