Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

त्यामुळे त्यांना मानसिक उपचारांची गरज : अशोक चव्हाण

Webdunia
शनिवार, 15 मे 2021 (09:29 IST)
मराठा आरक्षण फूलप्रूफ नव्हते यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केल्याने आणि भाजपचा भांडाफोड झाल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नैराश्यात गेले आहेत. त्यामुळे त्यांना मानसिक उपचारांची गरज आहे, अशी बोचरी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. 
 
सत्ता गेल्याचे नैराश्य, पुन्हा सत्ता मिळत नसल्याची हतबलता आणि मराठा आरक्षणाच्या 'फुलप्रुफ'तेचा सर्वोच्च न्यायालयात भंडाफोड पाटील बेताल बोलत आहेत, असेही ते म्हणाले. मराठा समाजासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा, अशी मागणी करताना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्याचा संदर्भ देत चव्हाण यांनी जोरदार टीका केली आहे. 
 
भाजपला सत्ता गेल्याचे नैराश्य होतेच. सतत तारखा देऊन महाविकास आघाडी सरकार अस्थिर होत नसल्याने हतबलताही आली आहे. मराठा आरक्षणाबाबत भाजपने खोटे दावे केले होते. त्याचा सर्वोच्च न्यायालयानेच भंडाफोड केल्याने चंद्रकांत पाटील सैरभैर झाले आहेत. या ताणतणावामुळे नेमके काय बोलावे हे कळेनासे झाल्याने त्यांचा तोल जात आहे. योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, अशी टीका केली आहे.
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments