Dharma Sangrah

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात आलेला हा दुरावा कमी होणार

Webdunia
मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (14:46 IST)
खरी शिवसेना कोण? यासंबंधी निर्णय झालेला नाही. सुप्रीम कोर्टातील दाखल याचिकांवर निर्णय प्रलंबित असून, निवडणूक आयोगानेही अद्याप कोणता निर्णय दिलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून त्यांच्यावर सतत टीका आणि आरोप होत आहेत. एकनाथ शिंदेंनीही त्यांच्या टीकेला अनेकदा प्रत्युत्तर दिलं आहे. यामुळे भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात आलेला हा दुरावा कमी होणार का? अशी विचारणा केली असता एकनाथ शिंदे यांनी यावर उत्तर दिलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधला. यावेळी त्यांना भविष्यात उद्धव ठाकरे आणि तुम्ही एकत्र येणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “आज आम्ही ज्या मार्गाने चाललो आहोत, तिथे बाळासाहेबांचे विचार, राज्याचा सर्वांगीण विकास याकडे लक्ष आहे. जनतेच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केलं आहे. ज्या ठिकाणी आम्ही जातो तिथे लोकांच्या चेहऱ्यावर वेगळं पहायला मिळत आहे. याचा अर्थ त्यांनी सरकारला मान्यता दिली आहे. लहान मुलं, राजकारणाशी संबंध नसणारे तुमचं पाऊल राज्याच्या हिताचं आहे असं सांगतात. त्यामुळे टीका करणाऱ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्यापेक्षा, कामातून उत्तर देऊ हा माझा स्वभाव आहे”.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: पार्थ पवारांवर अटकेची टांगती तलवार नाव एफआयआरमध्ये जोडले जाणार?

नाशिकमध्ये भीषण आग! दुकाने जळून खाक

अमित शाह आणि मोहन भागवत अंदमान आणि निकोबारला भेट देणार, सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण होणार

Goa fire जिल्हा प्रशासनाने उत्तर गोव्यात नाईटक्लब आणि हॉटेल्समध्ये फटाके वाजवण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला

नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान कोण होणार? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी अखेर खुलासा केला

पुढील लेख
Show comments