Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ही भटकती आत्मा कधीच पाठलाग सोडणार नाही, शरद पवार पीएम मोदींबद्दल अस का म्हणाले?

Webdunia
मंगळवार, 11 जून 2024 (10:54 IST)
शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या 'भटकती आत्मा' या टीकेवर मोठे प्रतिउत्तर दिले आहे. जेष्ठ नेते शरद पवार म्हणाले की, ही भटकती पीएम मोदींना नेहमी अस्वस्थ करेल. 
 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या 'भटकती आत्मा' वाल्या टीकेवर प्रतिउत्तर दिले आहे. पवार म्हणाले की, ही भटकती आत्मा पीएम मोदीला नेहमी अस्वस्थ करीत राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक प्रचारादरम्यान ज्या भाषेचा वापर केला होता, त्यामुळे त्यांच्या पदाची गरिमा कमी झाली. शरद पवार सोमवारी अहमदनगरमध्ये एनसीपीच्या 25 व्या स्थापन दिवस प्रसंगावर आयोजित रॅलीमध्ये ही गोष्ट बोलले. 
 
पवार म्हणालेत की, ''मोदीजींनी आपल्या एका निवडणूक भाषणामध्ये मला 'भटकती आत्मा' असे संबोधन दिले होते. मोदींनुसार 'आत्मा' नेहमीच असते आणि याकरिता 'आत्मा' त्यांना अस्वस्थ करीत राहील.'' 
 
शरद पवारांनी मोदींवर निशाणा साधत प्रश्न विचारला की, त्यांच्या जवळ पंतप्रधानच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी पर्याप्त 'जनादेश' आहे का? सध्याचा संपलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप बहुमत प्राप्त करू शकली नाही. केंद्रामध्ये नवीन सरकार बनवण्यासाठी एनडीए युतीची मदत घ्यावी लागली. भाजपला निवडणुकीमध्ये 240 सीट मिळालेत एनडीए घटकांसोबत हा आकडा 293 पर्यंत पोहचला. 
 
तसेच पवार म्हणाले की, ''नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. पण, शपथ घेण्यापूर्वी त्यांना देशाच्या जनतेचा जनादेश मिळाला का? देशाच्या जनतेने त्यांना याकरिता सहमती दिली का? भाजपाजवळ बहुमत न्हवते. त्यांना तेलगू देशम पार्टी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारची मदत घ्यावी लागली. यामुळे ते सरकार बनवू शकले.'' 
 
तसेच ते म्हणाले की, लोकांना वाटले की, राम मंदिर निर्माण राजनीतीमध्ये प्रासंगिक असेल पण भाजपचा उमेदवार अयोध्यामध्ये हरला. पवार म्हणाले की, ''जर मी उद्या अयोध्यामध्ये राम मंदिरात गेलो तर याचा वापर माझ्या राजनीतीसाठी करणार नाही. अयोध्या जनतेने मोदींना वाईट कामांनी ओळखले आणि भाजप उमेदवारची हार सुनिश्चित केली. 
 
  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

180 कोटी रुपयांचे कर्ज न भरल्याचे प्रकरण, विजय मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

हाथरसमध्ये सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 100 पेक्षा जास्त

नरेंद्र मोदींचं राहुल गांधींना 'बालक बुद्धी' संबोधून प्रत्युत्तर पण 'मणिपुरा'त वाहून गेलं भाषण

भारत न्याय संहिता लागू; यापुढे जुन्या IPC कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांवर काय परिणाम होतील?

Pune Porsche Case:अल्पवयीन मुलाच्या आजोबा आणि वडिलांना जामीन मंजूर

सर्व पहा

नवीन

सराईत गुन्हेगाराच्या खुनाप्रकरणात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा दाखल

दानवेंच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर भाजपचा आक्षेप, कामकाज 3 वेळा तहकूब

गरीब मुलींच्या सामूहिक विवाहाने झाली अंबानी कुटुंबातील विवाह सोहळ्याची सुरुवात

हाथरसमध्ये सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरीत 60 लोक मृत्युमुखी, अनेक जखमी

लोकसभा अध्यक्ष सदस्यांचा माइक बंद करू शकतात का? माइकचं नियंत्रण कोणाकडे असतं?

पुढील लेख
Show comments