Dharma Sangrah

सरकारवर हत्येचा गुन्हा दाखल करा

Webdunia
गुरूवार, 4 जुलै 2019 (12:57 IST)
रत्नागिरीतील तिवरे धरण दुर्घटनेतील मृत्यू हे सरकारी अनास्थेचे बळी आहेत. त्यामुळे या सरकारवर हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे. तिवरे धरण फुटल्याने परिसरातील सात गावे पाण्याखाली गेली होती. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने 7 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण बेपत्ता आहेत. 
 
मुसळधार पावसामुळे मंगळवारी रात्री तिवरे धरण भरून वाहू लागले होते. काही वेळाने धरणाला भगदाड पडल्याचे लक्षात आल्याने तलाठ्यांनी धरणाच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला. पण तासाभरातच धरण फुटले आणि परिसरातील गावांमध्ये पाणी शिरले होते. बेंड वाडीतील काही ग्रामस्थ वाहून गेले. आतापर्यंत सातजणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत असतानाच, विरोधकांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारी अनास्थेचे हे बळी आहेत. त्यामुळे या सरकारवरच हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केली आहे. 
 
जलसंपदामंत्र्यांनी राजीनामा द्यावा  
सर्व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. शिवसेनेचे आदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीने धरणाचे बांधकाम केले होते. त्यामुळे आमदार आणि कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

IPL 2026: दिल्ली कॅपिटल्स खेळाडूच्या चेहऱ्यावर चेंडू लागला, रुग्णालयात दाखल

RCB vs GT: चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचा या हंगामातील चौथा विजय

स्पॅनिश टेनिस सुपरस्टार कार्लोस अल्काराझने फ्रेंच ओपनमधून माघार घेतली

'आप'मधून भाजपमध्ये गेलेल्या राज्यसभा खासदारांवर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया

Maharashtra Medical Council Election: एमएमसी नऊ सदस्यांच्या निवडणुकीसाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार

पुढील लेख
Show comments