rashifal-2026

तिहेरी हत्याकांड, क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नी आणि दोन मुलींची हत्या केली

Webdunia
मंगळवार, 5 मार्च 2024 (11:24 IST)
राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका मध्यमवयीन व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलींची निर्घृण हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मौशी गावात रविवारी ही घटना घडली. 50 वर्षीय अंबादास तलमले यांनी त्यांची 42 वर्षीय पत्नी अलका, 19 वर्षांची मुलगी प्रणाली तलमले आणि 17 वर्षांची मुलगी तेजू तलमले यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. मारेकरी पती अद्याप पोलिसांच्या ताब्यात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पती अंबादास याचा पत्नीसोबत वाद सुरू होता. दरम्यान काल पहाटे क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. यादरम्यान अंबादासचा संयम सुटला आणि त्याने शिवीगाळ सुरू केली. दरम्यान रागाच्या भरात अंबादासने पत्नी व दोन मुलींवर कुऱ्हाडीने वार केले. त्याचा जागीच मृत्यू झाला.
 
या खुनाची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील कायदेशीर कारवाई केली. पोलिसांनी तिन्ही महिलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. तसेच आरोपी अंबादास याला अटक केली.
 
पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत. घटना घडली त्यावेळी अंबादास यांचा मुलगा घरी नव्हता, तो कामावर गेला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

LIVE: सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या नवीन उपमुख्यमंत्री होतील का?

सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या नवीन उपमुख्यमंत्री होतील का? फडणवीस यांच्या कॅबिनेट मंत्र्यांनी याबाबत संकेत दिले

Ajit Pawar plane crash बारामती अपघाताचे सत्य ब्लॅक बॉक्स उघड करेल, दिल्लीत मोठी कारवाई सुरू, एएआयबी चौकशीत गुंतले

मंत्री प्रताप सरनाईक यांनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली

विमान वाहतूक मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून अपघाताच्या चौकशीत सहकार्य मागितले

पुढील लेख
Show comments