Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंबरनाथच्या चिखलोली धरणात दोन मुलं बुडाली

Webdunia
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (08:39 IST)
अंबरनाथच्या चिखलोली धरणात दोन लहान मुलं बुडाल्याची घटना घडलीये. या मुलांचा अद्यापही शोध लागू शकलेला नाही. 
सार्थक ओमले आणि महादेव मिस्त्री अशी या दोघांची नावं असून ते अंबरनाथ पूर्वेच्या महालक्ष्मी नगर टेकडी परिसरात वास्तव्याला आहेत. शालेय विद्यार्थी असलेले हे दोघे रविवार असल्यानं चिखलोली धरणात पोहण्यासाठी गेले होते. मात्र तिथे पाण्याचा अंदाज न आल्यानं हे दोघे बुडाले. याबाबतची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बोटीच्या आणि हुकच्या साहाय्याने या दोन मुलांचा शोध सुरू केला. मात्र दिवसभर शोध घेऊनही हे दोघे सापडू शकले नाहीत. अखेर अंधार पडल्यानं आजचं शोधकार्य थांबवण्यात आलं असून, पुन्हा शोधकार्य सुरू केलं जाणार असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.

संबंधित माहिती

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

पुढील लेख
Show comments