Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दोघा पोलिसांवर जबरी चोरीचा गुन्हा, दोघे गेले होते छापा टाकायला

Webdunia
बुधवार, 1 मे 2019 (09:41 IST)
वर्धा येथे वेगळीच घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्या ऐवजी त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला आहे. अल्लीपूर भागातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांवर मासळी विक्रेत्याचे पैसे हिसकावल्या मुळे नागरिकांनी पैसे हिसकावल्यानंतर स्थानिक गावकऱ्यांनी संबंधित पोलिसांना बेदम मारहाण केली. तसेच जबरी चोरीचा गुन्हाही दाखल केला.
 
सविस्तर वृत्त असे की, पूर्ण दिवसभरातील व्यवसायाचा हिशेब सुरु होता, पोलिसांनी जुगार समजून मांसळी विक्रेत्यांचे पैसे हिसकल्याचे सांगण्यात येत आहे. हे पैसे हिसकावण्याचा हाच प्रकार पोलिसांच्या अंगलट आला आहे. गावातील नागरिकांनी दोन्ही पोलिसांना चोर समजून मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलिसांच्या तक्रारीवरुन 15 ते 20 जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला तर स्थानिकांच्या तक्रारीवरुन या 2 पोलीस कर्मचार्‍यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सचिन सुरकार, राजरत्न खडसे अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांची नावे असून, हिंगणघाट तालुक्याच्या अल्लीपूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. या ठाण्यांतर्गत कात्री येथे जुगार सुरु आहे असे पोलिसांना कळले, त्यावरुन दोघेही छापा टाकायला गेले होते. तर दुसरीकडे गावकऱ्यांनी म्हणतात की कात्री परिसरात मासे विक्रेते आठवडी बाजारातून मांसळी विक्रीच्या पैशांचा हिशेब करत बसले होते. त्यावेळी गणवेश नसलेल्या पोलिसांनी विक्रेत्यांकडून पैसे ओढून घेतले, त्यावेळी उपस्थितांनी दोघांनाही चोर समजून मारहाण केली आहे. 

संबंधित माहिती

SRH vs KKR : कोलकाताने हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी सांगितले

लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानात एअर टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू,अनेक जखमी

मनीष सिसोदिया यांना उच्च न्यायालयाचा धक्का, जामीन अर्ज फेटाळला

Covid 19: सिंगापूरमध्ये कहर केल्यावर आता KP1 आणि KP2 प्रकारांच्या संसर्गाचा भारतात शिरकाव

पुणे प्रकरणातील तिन्ही आरोपींना 24 मेपर्यंत पोलिस कोठडी

Pune Porche Accident :अल्पवयीन आरोपीला दारू देणारा बारला सील केले

आयसीएमआरने कोवॅक्सिन वरील बीएचयूच्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले

KKR vs SRH सामन्यात पाऊस पडला तर IPL फायनलचे तिकीट कोणत्या संघाला मिळेल? तपशीलवार जाणून घ्या

T20 World Cup 2024:भारत पहिल्यांदाच या संघांशी भिडणार, जाणून घ्या सामना कधी होणार

पुढील लेख
Show comments