Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दोन बहिणींचा बंधाऱ्यात बुडून दुर्देवी मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 3 जून 2022 (16:25 IST)
माजलगावातील बीड तालुक्यात महातपुरी येथे आपल्या मावशीकडे सुट्ट्यात आलेल्या दोन बहिणींचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज सकाळी घडली आहे. दीपाली गंगाधर बरबडे(20 रा.आनंदगाव ता.परतूर) आणि स्वाती चव्हाण(12) असे या मृत्युमुखी झालेल्या बहिणीचे नाव आहे. त्या काही दिवसांपूर्वी माजलगाव तालुक्यातील महातपुरी येथे राहणाऱ्या आपल्या मावशी कडे सुट्ट्यात आलेल्या होत्या. मयत दोघी मावस बहिणी आहे. त्या आपल्या मावशी आणि आई सोबत गोदावरी नदीवर असलेल्या बंधाऱ्यावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास स्वाती बंधाऱ्यात अंघोळ करताना पाय निसटून पाण्यात पडली आणि बुडू लागली. तिला वाचविण्यासाठी दीपाली पाण्यात गेली आणि त्या दोघी पाण्यात बुडाल्या. 

त्यांना पाण्यात बुडताना पाहून बंधाऱ्यावरील महिलांनी आरडाओरड केली आणि लोकांना मदतीसाठी बोलावले. तो पर्यंत त्या बुडाल्या होत्या. त्यांना शोधण्यात सुमारे एक तास गेला. त्यांना शोधून त्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आणि ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

महाराष्ट्रात लवकरच ई-बाइक टॅक्सी सुरू होणार, राज्य सरकारने दिली मंजुरी

भारतातील या राज्यात एक जोरदार भूकंप झाला,लोक घराबाहेर पडले

वक्फ विधेयकावर गोंधळ सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्या वर घणाघात टीका

महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

पुढील लेख
Show comments