Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह: मुख्यमंत्र्यांचा आज राज्यातील जनतेशी संवाद

Webdunia
रविवार, 8 ऑगस्ट 2021 (16:28 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (8 ऑगस्ट) राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. आज रात्री 8 वाजता उद्धव ठाकरे यांचं फेसबुक लाईव्ह होईल.
 
गेल्या आठवड्यातच राज्यातील 25 जिल्ह्यांतील कोरोना प्रतिबंधक निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली होती. पण राज्यात 11 जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध अद्याप लागू आहेत.शिवाय मुंबईमध्ये लोकल सेवाही सर्वसामान्य नागरिकांसाठी अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.

दरम्यान, विरोधी पक्ष आणि काही व्यापारी-नागरिक संघटना या निर्बंधांचा विरोध करतानाही दिसत आहे.या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिन्यांत तिसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 
उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीचं फेसबुक लाईव्ह 30 मे रोजी केलं होतं. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी उद्धव ठाकरे फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.
 
गेल्या काही दिवसांत राज्याला विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. या काळात दरड कोसळणं, महापूर यांच्यासारख्या घटनांमुळे राज्यातील अनेक नागरिकांना त्याचा फटका बसला.
 
यादरम्यान,उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त, आपत्तीग्रस्त भागाचा दौराही केला होता. या परिसरातील नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल,असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.
 
त्यामुळे आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये उद्धव ठाकरे याविषयी काय घोषणा करतात, याची उत्सुकताही नागरिकांना आहे.
 

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments