suvichar

सामनाची मुंबई कुलगुरूंवर झहरी टीका, निकालांचे श्राद्ध - उद्धव ठाकरे

Webdunia
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017 (11:46 IST)

ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेतल्यामुळे कुलगुरू डॉ. संजय देशमुख हे 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याच्या परीक्षेत नापास झाले आहेत. यावरुन सामना संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्यावर जबरदस्त टीका केली आहे. वाचा सामना ने काय टीका केली आहे ती

मुंबई विद्यापीठाचे वैभवशाली टॉवर झडताना व पडताना दिसत आहेज्या विद्यापीठाने अनेक पिढय़ा घडवल्या ते विद्यापीठ परीक्षा व निकालांचे श्राद्ध घालताना दिसत आहेसंघविचाराचे आहेत म्हणून कुलगुरूंना माफी नाहीत्यांना जावेच लागेलकुलगुरूंची वकिली करणाऱ्यांच्या जिव्हा झडून जातील व लाखो विद्यार्थ्यांचे तळतळाट त्यांना लागतीलमुंबई विद्यापीठातील अनागोंदीमुळे चार लाख विद्यार्थ्यांच्या जीवनात जे खड्डे’ पडले आहेत त्यावरही कुणी तरी आता ‘‘मुंबईतुझा विद्यापीठावर भरवसा नाही काय!’’ असे गाणे वाजवायला हरकत नाही!

अनागोंदीची जबाबदारी
शिक्षण मंत्री तसेच विद्यापीठाच्या कुलगुरूंवर तर जातेच, पण इतका बेफिकीर, अकार्यक्षम कुलगुरू नेमणाऱ्या सरकारवरदेखील जाते. नव्या राजवटीत कुलगुरू निवडीचा घोटाळा झाला आहे व तो गंभीर आहे. राज्यपालांच्या नेमणुका या संघविचारक आणि प्रचारकांच्याच झाल्या आहेत. देशात प्रथमच संघविचारक व प्रचारक हे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधान बनले आहेत, पण निदान पिढी घडवणाऱ्या शैक्षणिक संस्था तरी त्यातून सुटाव्यात व ‘मेरिट’वर या नियुक्त्या व्हाव्यात. संघविचार हा गुन्हा नाही व त्या विचाराने कुणाचे नुकसान होणार नाही. आम्ही तर सरसंघचालकांचेच नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे केले होते, पण सध्या मुंबई विद्यापीठाची जी घसरण सुरू आहे ती पाहता सरसंघचालक कुलगुरूंना व त्यांना नेमणाऱ्यांना काठीने फोडून काढतील असे चित्र आहे. 

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

LIVE: ठाणे-मुलुंड रेल्वे स्थानकाला आनंद दिघे यांचे नाव देण्यात येईल

महाराष्ट्र एसटी कॉर्पोरेशनमध्ये चालक आणि वाहकांच्या १७,७४२ पदांसाठी मोठी भरती

नीता अंबानी यांना सामाजिक विकासातील योगदानाबद्दल ह्यूमैनिटेरियन अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले

नागपूर-भंडारासह ८ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, अलर्ट जारी

एसआयआर एप्रिलमध्ये सुरू होणार! मुंबईत भाजपच्या एका उच्चस्तरीय बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला

पुढील लेख
Show comments