Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उद्धवजी, तुमचे उरलेले दोन चारजण वाचवा नाही तर शिंदे साहेब तेही घेऊन पळतील : बावनकुळे

Webdunia
शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (14:48 IST)
उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिले आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिलदार नेते आहेत. ते माझे मित्र आहेत. उद्धव ठाकरेही आमचे मित्र होते. ते शरद पवारांच्या नादी लागले. उद्धव ठाकरेंबद्दल एक सांगतो. एक दिवस ते चार लोक पक्षात राहतील. माझे कुटुंब, माझी जबाबदारी अशी त्यांची अवस्था होईल. उद्धवजी, तुमचे उरलेले दोन चारजण वाचवा. नाही तर शिंदे साहेब तेही घेऊन पळतील. त्यामुळे टीका करणे सोडा, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली.
 
यावेळी चंद्रशेखर बावनकुळेंनी यावेळी शिवसेनेच्या जन आक्रोश मोर्चावर टीका केली. शिवसेनेला जन आक्रोश मोर्चा काढण्याचा अधिकार नाही. ते इव्हेंट मॅनेजमेट करत आहेत. अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे पक्षात नाराज नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
 
उद्धव ठाकरे घाबरले आहेत. म्हणून मोठी भाषण सुरू आहेत. त्यामुळेच नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. उद्धव ठाकरे यांनी विचार करून बोलले पाहिजे. अमित शहा आणि उद्धव ठाकरे म्हणजे सूर्यासमोर दिवा आहे, त्यांचे नाव घेऊन बोलू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

ठाण्यात मृत व्यक्तीविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

ठाण्यात २.२१ लाख रुपयांचा गुटखा जप्त, तर लग्न समारंभात हवेत रिव्हॉल्व्हर चालवल्याबद्दल भाजपा पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

17 february आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी विशेष

कुर्ला परिसरात 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, दोन अल्पवयीन मुलांना अटक

LIVE: राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही-देवेंद्र फडणवीस

पुढील लेख
Show comments