Festival Posters

खोटी गुणवत्ता सांगणारी शिक्षणपद्धती बंद : विनोद तावडे

Webdunia
शनिवार, 19 जानेवारी 2019 (10:17 IST)
राज्यातल्या शिक्षण विभागाकडून डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. विजय भटकर, सोनम वांग्चुक अशा तज्ज्ञ मंडळींना घेऊन आंतरराष्ट्रीय बोर्डाचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. आगामी काळात या बोर्डाला विशेष महत्त्व प्राप्त होईल, अशी योजना आखल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. विद्यार्थ्यांकडून घोकंपट्टी करून घेऊन त्यांची खोटी गुणवत्ता सांगणारी शिक्षणपद्धती बंद करून कौशल्य शोधून ते विकसित करणारे शिक्षण महाराष्ट्रात दिले जाईल, असेही ते म्हणाले.राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या (स्वायत्त) दुसऱ्या पदवीदान समारंभप्रसंगी ते बोलत होते. 
 
शिक्षणात केलेल्या बदलाबद्दल सांगताना तावडे म्हणाले, दहावी, बारावीची फेरपरीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना पुन्हा पुढच्या वर्षांत संधी देण्याचा प्रयोग आपण यशस्वी केला. जूनमध्ये निकाल लागल्यानंतर जुलमध्ये परीक्षा घेऊन ऑगस्टमध्ये निकाल लावून ३५ हजार विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. तरीही जे अनुत्तीर्ण राहिले त्यांना प्रशिक्षण देऊन कौशल्य विकासाची संधी दिली व त्यांच्यावरील नापासाचा शिक्का पुसला असल्याचे त्यांनी सांगितले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

होर्मुझची सामुद्रधुनी सुरु झाली; इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची घोषणा

LIVE: अशोक खरात प्रकरणातील प्रमुख साक्षीदार जितेंद्र शेळके यांचे रस्ते अपघातात निधन

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये १०% भाडेवाढीमुळे एसटी बसचा प्रवास महाग झाला

महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी अनिवार्य, नियमांचे उल्लंघन केल्यास मान्यता रद्द होणार

इंडोनेशियाच्या बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर कोसळले, ८ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments