Marathi Biodata Maker

चमत्कार नाही तर तंत्रज्ञान, मुंबई - पुणे फक्त ३० मिनिटात

Webdunia
राज्य सरकारने मुंबई-पुणे प्रवास सर्वात कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी एक मोठा महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, हा या वर्षीच्या २०१९च्या  अखेरपर्यंत सुरु होणार आहे. हे मोठे आणि महत्वाचे  काम करणाऱ्या व्हर्जिन हायपरलूप वन (Virgin Hyperloop One) अमेरिकन कंपनीचे भारताचे व्यवस्थापकीय संचालक धालिवाल कन्स्ट्रक्शन वीकला याविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे हा चमत्कारच ठरणार आहे. 
 
मुंबई ते पुणे हायपरलूप मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर साडेतीन तासांचा मुंबई-पुणे प्रवास फक्त आणि फक्त  25 मिनिटात पूर्ण  करता येणार आहे. अर्थात  मुंबईवरुन पुण्याला किंवा पुण्यावरुन मुंबईला जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे तब्बल 3 तास पूर्ण वाचणार आहेत.  पुणे व मुंबईमधील अंतर हे जवळपास 150 किलोमीटर असून,  या प्रस्तावित प्रकल्पाचा फायदा जवळपास 2 कोटी 60 लाख नागरिकांना होईल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.सोबतच मुंबई-पुणे हायपरलूप मार्गामुळे पुणे आणि नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळही जोडले जाणार असून, पहिल्या टप्प्यात केवळ 11.8 किलोमीटरचा ‘डेमॉन्स्ट्रेशन ट्रॅक’ उभारला जाणार आहे. त्यामुळे आता स्वप्नवत वाटणारे आता प्रत्यक्षात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ठरणार असून त्यामुळे राज्य एका वेगळ्या प्रगतीच्या वाटेवर जाणार आहे. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून ते स्वतः यामध्ये लक्ष देत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी इतिहास रचला

महायुतीतील जागावाटपावर रामदास आठवले नाराज, किमान 15-16 जागा आरपीआयला देण्याची मागणी केली

सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांना धक्का, जाहीर उमेदवार एआयएमआयएममध्ये सामील

लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला पुन्हा 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

शरद पवारांना मुंबईत मोठा धक्का : राखी जाधव भाजपमध्ये सामील, बीएमसी निवडणुकीपूर्वी समीकरणे बदलली

पुढील लेख
Show comments