rashifal-2026

८० टक्के पुणेकरांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव

Webdunia
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017 (10:59 IST)
एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार ८० टक्के पुणेकरांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव आढळून आला आहे. ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेत वाढ होण्याचा प्रकार भारतासह जगभरात दिसून आलेला आहे. भेसळयुक्त आणि प्रक्रिया केलेले अन्नाचे प्रमाण वाढल्यानेही ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव जाणवू लागला आहे.   आपल्या देशात व्हिटामिन कमतरता या विषयावर सर्वेक्षण केले गेले होते. तर यामध्ये धक्कदायक आकडे समोर आले असून १० पैैकी ८ पुणेकरांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची उणीव असल्याचे सिद्ध झाले आहे. सूर्यापासून मिळणारे जीवनसत्व असे ओळख असलेल्या  ‘ड’ जीवनसत्त्व सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर त्वचेमध्ये तयार होते. जीवनसत्त्वाच्या अभावामुळे खनिजांचे प्रमाण वाढून त्यामुळे हाडे ठिसूळ होऊ शकतात. त्यामुळे हाडांचे अनेक व्याधी सुद्धा जडतात तर अनेकांना चालणे मुश्कील होते. जसा डायबेटीस आपल्या देशात वाढला तसेच जीवनसत्त्वाची कमतरता आणि अभाव असलेल्या रुग्णांमध्ये भारतात वाढ होत आहे आसे समोर आहे. यामध्ये सर्वच वयातील नागरिक प्रभावित आहेत. आपल्यामध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव असल्याबाबत सामान्यांमध्ये जनजागृती झालेली दिसून येत नाही. त्यामुळे हाडांचे दुखणे कोणत्याही वयात हलके न घेता लगेच डॉक्टर गाठले पाहिजे. त्यामुळे भविष्यातील अनेक त्रास वेळीच दूर केले जाऊ शकतात.आणि नागरिक एक चांगले आयुष्य जगू शकणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

डोंबिवली पूर्वेतील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली, 29 दुचाकी जळून खाक

डोनाल्ड ट्रम्प गाझाच्या पुनर्बांधणीसाठी पाच अब्ज डॉलर्स देणार

छत्रपती शिवाजी महाराज टिपू सुलतान तुलनेचा वादावरून पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक, दोन महिला पोलिस अधिकारी जखमी

LIVE: पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक, दोन महिला पोलिस अधिकारी जखमी

टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुलनेवरून वाद, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments