Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सांगलीला पुन्हा इशारा कृष्णा नदीची पातळी वाढली, नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा

Webdunia
गुरूवार, 5 सप्टेंबर 2019 (10:15 IST)
राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात महापुरामुळे  उद्ध्वस्त केलेले संसार सावरण्यास सुरुवात झाली होती, मात्र त्यात पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रातील सांगली भागातील  नागरिकांची पुन्हा चिंता वाढली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कृष्णा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कोयना धरणातून पाण्याचा 73 हजार 63 क्युसेक्स विसर्ग सुरू असून, पुढील 2 दिवस हा विसर्ग असाच सुरू राहणार आहे, त्यामुळे सांगलीत पाण्याची पातळी  पुन्हा  वाढणार आहे. शहरातील असलेल्या आयर्विन पुलाजवळ सध्या 10 फूट 6 इंच पाणी पातळी आहे. हा विसर्ग असाच सुरू राहिल्यास ती पाणी तापळी 34 फूटावर वाढणार आहे. आयर्विन पुलाजवळ इशारा पातळी 40 फूट, तर धोका पातळी 45 फूट आहे. पाणी नदी पात्रामध्येच रहाणार असले, तरी नदीकाठच्या विशेषत: वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील आणि महानगरपालिका क्षेत्रातील लोकांना यामुळे धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि नदीपात्रात जावू नये, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्यात. 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments