Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, फक्त १० टक्केच पाणी उरले

Webdunia
मुंबईत मान्सून १३ जूननंतर दाखल होणार आहे. तोपर्यत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रातील जलसाठा आणखी खालवणार आहे. आताच  दहा टक्केच पाणीसाठा तलाव क्षेत्रात शिल्लक राहिला आहे.
 
मान्सून आणखी लांबल्यास किंवा पुरेसा पाऊस अपेक्षित दिवसांत झाला नाही, तर मात्र महापालिकेला राखीव साठा वापरावा लागणार आहे. मुंबईकरांना ऐन पावसाळ्यात जलटंचाईला सामोरे जावे लागू नये, म्हणून मुंबई महापालिकेने नियोजन सुरू केले आहे, शिवाय मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहनही केले आहे.
 
मुंबई शहर आणि उपनगरास दिवसाला ३ हजार ८०० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा या धरणांतून हा पाणीपुरवठा केला जातो. सध्याच्या जलसाठ्याचा विचार करता, मुंबईत दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. दहा टक्के पाणीकपात करण्यात आल्याने रोजचा पुरवठा ३ हजार ५०० दशलक्ष लीटरवर आला आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments