Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उजनी धरणातून सोलापूरसाठी पाणी

Webdunia
गुरूवार, 16 मे 2019 (09:38 IST)
उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोलापूर शहरासाठी आज अर्थात गुरुवारी सकाळी ६ वाजता पाणी सोडण्यास सुरुवात केली गेली आहे. चार गाळमोरीतून पाणी सोडण्यात आले असून त्यात आणखी वाढ करत तो ७ ते ८००० क्युसेक करण्यात आला आहे.
 
शहर पाणीपुरवठयाचा प्रमुख स्रोत असलेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज बंधारा सोमवारी कोरडा पडला. टाकळी इनटेक वेलमधील पाणी २२ मे पर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. या दोन दिवसात उजनी धरणातून पाणी न सोडल्यास शहरात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. शहराला उजनी ते सोलापूर जलवाहिनी, टाकळी ते सोरेगाव पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होतो. औज बंधाऱ्यातील पाणी टाकळी इनटेक वेलमध्ये घेतले जाते.  टाकळी इनटेक वेलमध्ये सोमवारी ९ फूट ६ इंच पाणी होते. हे पाणी २२ मे पर्यंत पुरेल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता संजय धनशेट्टी यांनी दिली. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी नुकतीच टंचाई आढावा बैठक घेतली. आता हे पाणी औजमध्ये पोहोचण्यास आठ दिवसांचा कालावधी लागतो. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments