Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोलापूरसाठी 10 एप्रिलला उजनीतून पाणी सोडणार

Webdunia
शुक्रवार, 3 एप्रिल 2020 (13:11 IST)
एकीकडे कोरोना विषाणूच संकटाला जनता सामोरे जात असताना दुसरीकडे औज बंधारा कोरडा पडून शहरावर पाणीटंचाईची शक्यता  निर्माण झाली आहे. मात्र महापालिकेच्या मागणीनुसार येत्या 10 एप्रिलला उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे.

शहराला उजनी-सोलापूर आणि टाकळी-सोलापूर या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होतो. मात्र, भीमा नदीवरील औज बंधारा सध्या पाण्याअभावी कोरडा पडला असून टाकळी व चिंचपूर बंधार्‍याजवळ उपलब्ध असलेल्या पाण्यावर शहरवासियांची तहान भागत आहे. आगामी जलसंकट ओळखून महापालिकेने जलसंपदा विभागाकडे उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली आहे. त्यानुसार येत्या 10 एप्रिलला उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचे नियोजन केल्याचे उजनी लाभक्षेत्र प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी सांगितले. 8 हजार क्युसेक या वेगाने पाणी सोडून 18 एप्रिलपर्यंत टाकळीला पाणी पोहोचेल, असे नियोजन असल्याचे ते म्हणाले.

जलसंपदा विभागाने 10 एप्रिलला पाणी सोडणांर असल्याचे सांगितले. भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने नदीकाठच्या लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लवकर पाणी सोडण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

संबंधित माहिती

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments