Festival Posters

सोलापूरसाठी 10 एप्रिलला उजनीतून पाणी सोडणार

Webdunia
शुक्रवार, 3 एप्रिल 2020 (13:11 IST)
एकीकडे कोरोना विषाणूच संकटाला जनता सामोरे जात असताना दुसरीकडे औज बंधारा कोरडा पडून शहरावर पाणीटंचाईची शक्यता  निर्माण झाली आहे. मात्र महापालिकेच्या मागणीनुसार येत्या 10 एप्रिलला उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे.

शहराला उजनी-सोलापूर आणि टाकळी-सोलापूर या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होतो. मात्र, भीमा नदीवरील औज बंधारा सध्या पाण्याअभावी कोरडा पडला असून टाकळी व चिंचपूर बंधार्‍याजवळ उपलब्ध असलेल्या पाण्यावर शहरवासियांची तहान भागत आहे. आगामी जलसंकट ओळखून महापालिकेने जलसंपदा विभागाकडे उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली आहे. त्यानुसार येत्या 10 एप्रिलला उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचे नियोजन केल्याचे उजनी लाभक्षेत्र प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी सांगितले. 8 हजार क्युसेक या वेगाने पाणी सोडून 18 एप्रिलपर्यंत टाकळीला पाणी पोहोचेल, असे नियोजन असल्याचे ते म्हणाले.

जलसंपदा विभागाने 10 एप्रिलला पाणी सोडणांर असल्याचे सांगितले. भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने नदीकाठच्या लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लवकर पाणी सोडण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

ओंकारेश्वर मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी भाविकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली

पुढील लेख
Show comments