Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानावर काय म्हणाले शरद पवार

Webdunia
शनिवार, 18 फेब्रुवारी 2023 (08:03 IST)
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मी पहाटेच्या शपथविधीची अर्धीच गोष्ट सांगितली आहे" असे विधान केले होते. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत की, "मला देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर भाष्य करून त्यांचे आणखी महत्त्व वाढवावे असे वाटत नाही. त्यांनी इतक्या दिवसांनी यावर विधान का केले? हे त्यांनाच विचारण्याची गरज आहे." असे मत त्यांनी व्यक्त केले.
 
गेले काही दिवस शरद पवार हे कसबा पोटनिवडणुकीनिमित्त मेळावा घेणार अशी चर्चा रंगली होती. याबद्दल त्यांना विचारल्यानंतर ते म्हणाले की, "उमेदवारांनी मला भेटून एखादी चक्कर टाका, असे सांगतिले. त्यावर विचार करू, पिंपरी चिंचवडमध्ये प्रचारासाठी गेलो की, कसब्यातही जावे लागेल. एका ठिकाणी गेलो तर दोन्ही ठिकाणी जावे लागते." असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेहच पुढे ते म्हणाले की, "गिरीश बापट यांना खरंच प्रचारात आणण्याची गरज होती का? हे मला माहिती नाही. काही दिवसांपूर्वीच गिरीश बापट यांना मी भेटून आलो. त्यांची प्रकृती चांगली नसून त्यांच्या यातना वाढू नये एवढीच अपेक्षा आहे,” असे ते म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

स्मृति इराणी यांनी गौरीगंजमध्ये केले मतदान, विकसित भारत संकल्प आणि महिला कल्याणासाठी टाकले मत

समुद्रात संपले नावेचे इंधन, भारतीय तटरक्षक दलाने वाचवले 26 लोकांचे प्राण

नाइट्रोजन पान खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलीच्या पोटात झाले छिद्र

या दिवशी महाराष्ट्रात आणि मुंबईत होणार Monsoon ची एन्ट्री, जाणून घ्या मोठे अपडेट

लोकसभा निवडणूक 2024 : महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात 13 सिटांसाठी मतदान

लज्जास्पद! 13 वर्षाच्या मुलाने मोठ्या बहिणीला केले प्रेग्नंट

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केलं

मुंबईमधील फ्लॅटमध्ये वृद्ध दांपत्याची आत्महत्या, दुर्गंधी आल्यामुळे पोलिसांनी तोडले दार

मी सुटणार आहे, मला या तुरुंगात राहू द्या- अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला एनकाऊंटर होण्याची भीती

Bank Holidays: या आठवड्यात फक्त 3 दिवस उघडल्या राहतील बँका, बँकेला चार दिवस सुट्टी! यादी पहा

पुढील लेख
Show comments