Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जे काही भाजपच्या पोटात तेच कंगनाच्या मुखात

Webdunia
शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (12:15 IST)
सध्या वाचाळ अभिनेत्री कंगना रनौत वरून राज्यात जोरदार राजकारण सुरू आहे. आता शिवसेने नंतर कॉँग्रेस महाराष्ट्र ने देखील वादात उडी घेतली आहे. 
 
“भारतीय जनता पक्षाच्या जे पोटात आहे तेचअभिनेत्री कंगनाच्या मुखातून गेल्या काही दिवसांपासून आणि ट्वीटमधून बाहेर येत आहे. मुंबई पोलीस, मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा कंगनाला पुढे करून अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील जनता कधीच माफ करणार नाही,” असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
 
“मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राच्या बदनामीचा नियोजनबद्ध कट बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोणी रचला आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विरोधात कारस्थाने करणारे आता महाराष्ट्र आणि मराठी माणसांविरोधात कट कारस्थाने करत आहेत. कंगनाचा बोलविता धनी कोण आहे हे उघड आहे, आपल्या राजकीय स्वार्थासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली आहे,” असे थोरात म्हणाले.
 
“ज्या मुंबईने आणि महाराष्ट्राने कंगना राणौतला काम, नाव, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिली त्याच मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे हा कृतघ्नपणा आणि महाराष्ट्रातील १३ कोटी मराठी जनतेचा अपमान आहे. असे थोरात यांनी स्पष्ट केले. त्यामुळेकंगना प्रकरण काही दिवस् तरी तापणार हे उघड आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments