Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रश्मी ठाकरेंच्या भावावर का केली ईडीने कारवाई? वाचा काय आहे प्रकरण

Webdunia
बुधवार, 23 मार्च 2022 (22:08 IST)
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबईत मोठी कारवाई केली. श्री साईबाबा गृहनिमिर्ती प्रायव्हेट लिमिटेडने विकसित केलेल्या रिअल इस्टेट प्रकल्पात ईडीने पुष्पक ग्रुपचे ११ निवासी फ्लॅट तात्पुरते सील केले आहेत. श्रीधर माधव पाटणकर हे साईबाबा गृहनिमिर्ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मुख्य आहेत. ही कारवाई अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर असल्याचे मानले जात आहे. कारण पाटणकर हे उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरे यांचे भाऊ आहेत. पाटणकर यांच्यावर ही कारवाई का झाली, नोटबंदीशी त्याचा काही संबंध आहे का हे आपण आता जाणून घेणार आहोत.
 
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने पुष्पक बुलियनवर कारवाई केली आहे. नोटाबंदीच्या वेळी (नोव्हेंबर ते डिसेंबर २०१६ दरम्यान) कंपनीने २५८ किलो सोन्याच्या तुलनेत ८४.५ कोटी रुपयांच्या जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ईडीचा दावा आहे की पुष्पक बुलियनने श्री साईबाबा गृहनिमिर्ती यांना उत्पन्नापेक्षा जास्त ३० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. ईडीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये श्री साईबाबा गृहनिमिर्तीने प्रमोट केलेल्या ठाण्यातील निलांबरी नावाच्या रिअल इस्टेट प्रकल्पातील ११ निवासी सदनिकांचा समावेश आहे. फ्लॅटची किंमत सुमारे ४५ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. महेश पटेल याने नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या संगनमताने पुष्पक ग्रुपच्या पुष्पक रिएल्टी या कंपनीच्या व्यवहारात फसवणूक केली आहे. नंदकिशोर अनेक शेल कंपन्या चालवतात. याबाबत महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, “मी विधानसभेत होतो. मला जास्त माहिती नाही. मी माहिती गोळा करेन आणि नंतर टिप्पणी देईन.” त्याच वेळी, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे ईडीच्या कारवाईवर म्हणाले की, “ही आमच्यावर सूडाची कारवाई आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा असा वापर लोकशाहीला घातक आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कामात अडथळा आणून सरकार अस्थिर करण्याचे काम भाजप करत आहे. शिवसेना अशा कारवाईला घाबरत नाही. सरकार आपले काम चालू ठेवेल.”
 
मार्च २०१७ मध्ये ईडीने पुष्पक ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीनंतर ८४.५ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा पिहू गोल्ड आणि सतनाम ज्वेलर्स या दोन ज्वेलरी कंपन्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर २५८ किलो सोने खरेदी करण्यासाठी पुष्पक ग्रुपमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आल्याचेही समोर आले आहे. ईडीने दावा केला की पुष्पक गटाने कबूल केले आहे की दोन्ही कंपन्या नोटाबंदी केलेल्या चलनांचे हस्तांतरण करण्यासाठी स्थापन करण्यात आल्या होत्या आणि त्या बनावट कंपन्या होत्या.

संबंधित माहिती

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

Lok sabha elections 2024 : भाजपला आता आरएसएसची गरज नाही,उद्या ते आरएसएसला नकली म्हणतील- उद्धव ठाकरे

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुढील लेख
Show comments