Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नानंतर महिनाभरातच नवरीने पूजेचे पैसे घेऊन ठोकली धूम

Webdunia
बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (08:22 IST)
लग्नाला महिना पूर्ण होताच नवरीने घरातून पलायन केल्याची घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पलायन करतांना सत्यनारायण पूजेसाठी घरात ठेवलेले सहा हजार रुपये व मोबाईल घेऊन पळाली. या बाबत तरुणाने डोक्याला हात मारून घेत लग्न जुळवून देणाऱ्या महिलेविरुध्द्व कारवाईसाठी पोलिसात धाव घेतली आहे.
 
सदर तरुणाचे लग्नच जुळत नव्हते. कालका माता मंदिर परिसरात राहणाऱ्या एक महिलेने माझ्या नात्यातील व ओळखीची मुलगी असल्याचे सांगून ती गरीब घरची असून लग्नाच तयार आहे. पण त्यासाठी लग्नाचा खर्च वरपक्षाने करावा, असे सांगत त्याची पूर्तता करून हे लग्न जुळवून आणले होते. त्यासाठी १ लाख १५ हजार रुपये या महिलेच्या माध्यमातून देण्यात आले. तिच्या सांगण्यावरून २ जुलै २०२१ रोजी सम्राट कॉलनीत लग्नही झाले. १० आगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजता नवरा व सासरे कामावर तर सासू किचनमध्ये स्वयंपाक करीत असताना  शौचास जाऊन येते, असे सांगून नवविवाहित पसार झाली, ती पुन्हा परतलीच नाही. त्यानंतर तिचा पती, सासरांनी  सर्वत्र शोध घेतला. तिच्या मानलेल्या भावाला फोन करून विचारले. मात्र, ती कूठेच आढळून आली नाही.
 
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवऱ्याने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. तेथे पत्नी हरविल्याची तक्रार नोंदविण्यात आली. मात्र, गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही. २१ सप्टेंबर २०२१ रोजी पोलीस अधीक्षक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार दाखल करून घेण्याबाबत विनंती केली आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments