Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कारगिल चौक भागात रात्री जुन्या भांडणाची कुरापत काढून तरुणाचा खून

Webdunia
बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (15:57 IST)
नाशिकमध्ये लेखानगर चौपाटीजवळ एका तरुणाचा खून झाल्याच्या घटनेला महिना उलटत नाही, तोच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारगिल चौक भागात जुन्या भांडणाची कुरापत काढून एका तरुणास धारदार शस्त्राने भाेसकून खून करण्यात आल्याच्या घटनेने परिसर हादरला.
 
माहितीनुसार, अंबड पोलीस ठाणे हद्दीतील दत्तनगरमध्ये पूर्व वैमनस्यातून सराईत गुन्हेगारासह तिघांनी धारदार शस्त्राने एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली.खुनाच्या घटनेनंतर सराईत गुन्हेगासह हल्लेखोर फरार झाला असून,पोलीस त्याच्या मागावर आहेत.राहुल गवळी (वय २५, रा. नाशिक) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
 
सिडकोतील स्टेट बँक चौपाटीजवळ असलेल्या सोनाली मटन खानावळीसमोर गेल्या बुधवारी २८ जुलै रोजी रात्री एका तरुणाचा खून केल्याचा प्रकार ताजा असताना मंगळवारी पुन्हा असाच प्रकार घडला आहे.अंबड पोलीस ठाणे हद्दीत महिनाभरात दोन खून झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी नऊ वाजेच्या सुमारास राहुल गवळी (२५) या तरुणास अंबड येथील कारगिल चौक परिसरात जुन्या भांडणाची कुरापत काढून संशयितांच्या टोळक्याने बेदम मारहाण करून प्राणघातक हल्ला करत धारदार शस्त्राने भोसकले. यात राहुल हा गंभीर जखमी झाल्याने या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments